मैत्री बित्री सब झूठ

किती दिवस झाले काही लिहिलं नाही कारण काही लिहावसं वाटलं नाही. मनात असुनही....आपण आपली मानलेली माणसं जेव्हा आपल्याला फाट्यावर मारतात तेव्हा चीड येते. का वागतात अशी माणसं? मैत्रीतही जेव्हा कोणी कॆलक्युलेशन्स बघतं तेव्हा तर संताप संताप होतो. अरे? तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही आमची कामं टाकून तुमच्या मदतिला धावायचं आणि गरज संपली की मात्र तुम्ही लगे़चच आपल्या कोशात शिरायच? मला सतत असे अनुभव आल्यानंतर आता वाटायला लागलंय की कदाचित मीच माणसं ओळखायला चुकतेय का? सहज समोरच्यावर विश्वास टाकून मैत्रीत गुरफटतेय का? समोरचा आपला फायदा करुन घेतोय हे समजत असुनही स्वत:ला आवरता येत नाही म्हणून स्वत:चाच राग येतो कधी कधी. का असतात माणसं अशी. आहात नां तुम्ही कॆलक्युलेटेड मग रहा नां तुमच्या घरात बंद. आधी मैत्रीचं नाटक करायचं, गोड गोड बोलायचं, मी खुप नशिबवान की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून भलावण करायची आणि आपलं काम झालं की पाठ फिरवायची. अशा माणसांना एकांतवासाचा शापच मिळायला पाहिजे. म्हणजे हे असे समोरच्याचा फायदा घेणार नाहीत. कधी तरी कोणी तरी असा घाव देउन जातं आणि मग मैत्रीवरचा विश्वासच उडतो. मैत्री बित्री सगळं झूठ आहे. खरं तर अशी सगळी नातीच खोटी आहेत. आहे तो फक्त फायदा. जो तो इथे स्वत:चा फायदा फक्त बघत असतो. एखाद्या पासून काहीच फायदा नसेल तर त्याच्याशी मैत्री सोडाच; पण तोंडओळखही कोणी ठेवत नाही आणि एखाद्याची आपल्याला गरज पडू शकते हे ल़क्शात आलं की त्याला जोडून ठेवलं जातं. अशा माणसांना मिळतातही माझ्यासारखी मैत्रीवर विश्वास असणारी मूर्ख माणसं.
 

2 comments:

HAREKRISHNAJI said...

Always remebmer that "Nobody can hurt you without your permission"

so

शिनु said...

खरं आहे पण आपण वेड्यासरखे त्यात वाह्त जाउन ती परवानगी अप्रत्यक्शपणानं देतोच नां