खट्टा मिठा

बिंदिया गोस्वामी. ऐंशीच्या सिनेमांतलं एक मॅटिनीस्टार नाव. येता जाता आवर्जून दखव घ्यावी असं काही तिच्या नावार फ़ार नाही, पण तिचा उल्लेख केल्याविनाच ऐंशीच्या दशकाचं पान उलटावं अशिही परिस्थिती नाही. तिचे सगळे सिनेमे अगदी निखळ मनोरंजन करणारे होते. हलके फ़ुलके विषय, खुसखुशित मांडणी असलेले. बच्चन-विनोद खन्ना छाप मसाला सिनेमातही ती दिसली मात्र अभिनेत्री म्हणून खुलली ती मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या सिनेमांमधे. बिंदिया गोस्वामी ही हेमा मालिनिच्या आईचं फ़ाईंड आहे. झालं असं की, एका पार्टीत त्यांनी बिंदियाला पाहिलं आणि त्यांना वाटलं की अरे ही तर अगदी डिट्टो आपल्या हेमाचं रूप आहे. चौदा वर्षाची बिंदिया सिनेमात चांगलं काम करू शकेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तिची शिफ़ारस केली. बिंदियाचा पहिला सिनेमा जिवन ज्योती (१९७५). यात विजय अरोरा तिचा नायक होता. सिनेमा अर्थात फ़्लॉप झाला पण बिंदिया मात्र निर्माता-दिग्दर्शकांच्या नजरेत आली. तिचा दुसरा सिनेमा खट्टा मिठा (१९७८) आणि इथून तिला सूरही सापडला आणि तिच्या टाईपच्या भूमिकांची जागाही.
काल रात्री एफ़एम वर अभिमन्यूनं खट्टा मिठा मधलं तुमसे मिला था प्यार गाणं लावलं आणि पुन्हा एकदा बिंदीयाची आठवण झाली. टिपिकल रेट्रो लूक असणारी बिंदिया फ़ार उच्च प्रतिचा अभिनय वगैरे करायची नाही पण तिच्या भूमिकंत एक साधेपणा असायचा आणि ती त्या भूमिक तितक्याच साधेपणानं करायची. बासू भट्टाचार्यांचे दोनही सिनेमे मला बिंदियासाठी आवडतात पैकी एक खट्टा मिठा आणि दुसरा हमारी बहू अलका. 
बासूदांनी ह्रषिकेश मुखर्जींकडे उमेदवारी केलेली असल्यानं बासूंदांच्या सिनेमांवरही ह्रषिदांची एक छाप आहेच. पिया का घर, हमारी बहू अलका तर अगदी ह्र्षिदा स्कूलची छाप असलेले बासूदांचे सिनेमे आहेत. 

एक पारसी विधुर आणि पारसी विधवा यांच्या लग्नाची गोष्ट असलेला खट्टा मिठा (१९७७) खट्टा कमी आणि मिठा जास्त होता. लग्नाच्या वयातली मुलं असणारं हे जोडपं भावनिक आधारासठी लग्न करतं. नवपरिणीत जोडपं आणि त्यांची लग्नाळू वयातली मुलं यांच्यातली गोड नोंकझोक म्हणजे खट्टा मिठा सिनेमा इंग्रजी  Yours, Mine and Ours वर आधारीत होता. (याच प्लॉटवर आधारीत गोलमाल रिटर्नस-करिना, अजय देवगण, मिथून- रत्ना पाठक यांचा अलिकडेच आलेला सिनेमाही सुपरहिट ठरला)  खट्टा मिठा मधली दोन गाणी हिट झाली. थोडा है थोडे की जरूरत है आणि तुमसे मिला था प्यार. संगीत होतं राजेश रोशन यांचं अआणि गीतं गुलझार यांची होती.


 ...पूछेंगे एक बार कभी हम तुमसे रूठकर
हम मर गये
हम मर गये अगर तो आप कैसे जियेंगे
वो ख़्वाहिशें अजीब थीं सपने अजीब थे
जीने को तेरी प्यार की दौलत मिली तो थी
जब तुम नहीं थे उन दिनों हम भी ग़रीब थे
तुमसे मिला था प्यार कुछ अच्छे नसीब थे
हम उन दिनों अमीर थे जब तुम क़रीब थे

हे असलं केवळ गुलझारच लिहू जाणे. एकुणात गोडवा ठासून भरलेलं हे गाणं आजही ऐकायला तितकंच फ़्रेश वाटतं.




 

1 comments:

Unknown said...

खूप सुंदर, लेखन आणी आठवणही. सर्वांचेच काम अफलातून! अशोककुमार, डेव्हीड,देवेन वर्मा, राकेश रोशन,पर्ल पदमसी, रणजीत, प्रीती गांगुली. सर्वजण अफलातून पारशी. अशोककुमार, डेव्हीड आणी देवेन वर्मा टेल्को पुण्यात काम करत असावेत. त्या कँपसचे शूटिंग आहे