मंजुचा व्हर्च्युअल स्वाईन फ़्ल्यु
सध्या सगळ्यांचं सगळं बरं चाललं असलं तरी बाप्पा येण्याआधी काही दिवस चांगली तंतरली होती. का? म्हणून काय विचारताय? अहो तो छळू स्वाईन फ़्ल्यु नव्हता का पिसाळला!मे महिन्याची सुट्टी आनंदात गेली, उशिरानं का होईना आलेल्या पावसाचं भजी बिजी खाऊन सेलिब्रेशनही झालं. चला आता प्रतिवर्षाप्रमाणे वाहत्या नाकांच्या पोरांची सर्दी तापादी दुखणी काढायची म्हणून आयांनी पदर खोचला. तेव्हढ्यात अचानकच खुसखुफ़ुसत घेतलं जाणारं स्वाईन फ़्ल्युचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झालं. मुळात ही नक्की काय भानगड आहे हेच सामान्यांना माहित नव्हतं. ते असण्याचं काही कारणही नव्हतं. अशाच सामान्य जीवजंतुंपैकी एक आमची मंजू. मधले दोन चार दिवस ज्यावेळेस या तापानं ताप दिला होता त्याचवेळेस नेमका हिचा पोट्टा आधी दोनदा शिंकला आणि मग सक्काळी सक्काळी खोकलाही. या पोट्ट्याहून लहान आणखी एक पोट्टं घरात रांगत होतं त्यामुळे बाईसाहेबांची घाबरगुंडी उडाली नसती तरच नवल. त्यातून मंजुचं कॆरॆक्टर म्हणजे, साधं निरूपद्रवी डोकं जरी बारीक दुखायला लागलं तर थेट ब्रेन ट्युमरपर्यंत जाऊन पोहोचणारं. मग तब्बल दोनदा शिंका आणि तीन चारदा खोकला तिला टेन्शन द्यायला पुरेसा होता. त्याचवेळेस विविध वाहिन्यांवरून याबाबतच्या बातम्यांचा मारा चालला होता. पुण्यातल्या बातम्या तर "सेन्सेक्स"च्या धर्तीवर देत होते. घरातून बाहेर पडलो तर अगदी शंभर टक्के हा ताप आपल्याला घेरणार याबाबत तिची खात्रीच झाली. पण करणार काय? पोराला दवाखान्यात तर घेऊन जायलाच हवं होतं. मग तिनं एक शक्कल लढविली, दवाखाना अगदी बंद व्हायच्या वेळेस जायचं ठरवलं म्हणजे पेशंटची गर्दी नसेल (हो आपल्याला काही झालेलं नसायचं आणि तिथल्या गर्दीत कोणाला असलं काही झालेलं असेल तर? उगाच रीस्क नको) तिथे ती गेली मात्र तिला समजलं की अगदी सेम टू सेम शक्कल अनेकांनी लढवली असल्यानं दवाखान्यात बरीच गर्दी होती. तिथे बिनधास्त खोकणारी मंडळी पाहून तर तिला घामच फ़ुटला. अर्थात तिथले बहुतांश लोक मंजूसारखेच घाबरलेले असल्यानं सगळ्यांनी धरू की नको करत नाकावर रूमाल धरला होताच. अखेर मंजुची त्या वातावरणातून सुटका झाली. पोराला साधं निरूपद्रवी इन्फ़ेक्शन झालेलं होतं. काही दिवस औषधं घेतल्यावर ते बरं होणार होतं. डॊक्टरनी इतकं सांगुनही हिच्या मनातून शंका पूर्ण गेलेली नसल्यानं तिनं उच्च कोटीची काळजी घ्यायचं ठरवलं. आता काळजी म्हणजे किती घ्यावी? दिवसातून चार पाचदा धुण्याचं मशिन चालू झालं (याचा परिणाम अर्थातच या महिन्याच्या बिलावर लगेचच दिसला). तासा तासाला अंगावरचे कपडे मशिनमध्ये जायला लागले. डेटॊलच्या बाटल्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या. मोबाईल, रिमोट, दारांची, हॆंडल क्लिनिकल स्पिरीटनं पुसणं सुरू झालं. दर वीस मिनिटांनी मोजून पंधरा सेकंद हात धुण्याचा प्रोग्रॆम सुरू झाला. घराची सफ़ाई म्हणू नका, धुलाई म्हणू नका, धुप म्हणू नका. तिनं स्वच्छतेचा झंजावातच आणला. हे सगळं कमी म्हणून तुळस घालून उकळलेलं पाणी पिण्याची सक्ती, च्यवनप्राश खाण्याची सक्ती या मुळे घरचे बेहाल झाले. यथावकाश पोराचा खोकला गेला मात्र सतत पाण्यात राहून आणि सतत धुळ झटकत राहून हिलाच शिंका यायला लागल्या. सगळ्यांनी समजावुनही तिच्या मनातला शंकासुर जाईना. अखेरीस गणपतीच्या सामान खरेदीनिमित्त घाबरत घाबरत ती घराबाहेर पडली, यथावकाश त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या दिमतीत हे सगळं विसरलीही आणि घरच्यांनी हुश्श केलं!
बायको जेंव्हा बायका बघायला सांगते
जनरली नवरा दुसर्या बाईकडे बघत असेल तर बायकोला राग येतो. सहाजिकच आहे म्हणा. पण असेही काही नवरे असतात ज्यांच्या बायकाच त्यांना दुसर्या बाईकडे "बघ" असं सांगतात. पण थांबा. इतक्यातच, किती भाग्यवान ते नवरे असं वाटून घेऊन हळहळू नका. चंदूची बायकोही अशाच बायकांपैकी आहे. घरात, दारात, रस्त्यावर कोठेही गेलं की ती समो्रून येणार्या बाईकडे चंदूला बघायला सांगते. तोही बिचारा अद्न्याधारकपणे बघतो. तसं बायकांकडे बघायला त्याची ना नसते, मात्र या सगळ्या बायका "७५ एम एम" फ़िगर बाळगणार्या असतात. (विशेष सूचना- जाड, जाड्या, ढब्या, लठ्ठ, अवाढव्य अशा सर्व प्रकारच्या फ़िगर्सबाबत मला व्यक्तिश: सहानुभुती आहे. त्यामुळे वाचकांपैकी कोणी या मापदंडात बसत असेल तर क्रुपया राग मानू नये. बच्चा समझके माफ़ करना :))तर चंदूचं लग्न झाल्यानंतर साधारण वर्षभरानं म्हणजे त्याची चवळीची शेंग क्रमश: बदलत भोपळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिला जाणवलं की आपण जरा जास्तच सुटलो आहोत. सुटलो आहोत हे जरी समजलं असलं तरी कितपत सुटलोय याचा अंदाज तिला येत नसल्यानं तिनं चंदुचं मत अजमावायचं ठरवलं. "चंदू मी किती जाड आहे"? या प्रश्नाला चतुर नवरा जे उत्तर देईल तेच त्यानं दिलं,"छे गं, मला तर तू बारीकच वाटतेस". वरकरणी बायको खुश झालेली असली तरी "आपण जरा सुटलोयच" हा विचार तिच्या मनातून न गेल्यानं सोसायटीतल्या, ओळखितल्या, नात्यातल्या सगळ्या बायकांची नावं घेऊन मी तिच्याइतकी आहे की तिच्यापेक्शा जाड? की तिच्याहून बारीक अशी तोंडी परिक्शा घेऊन तिनं चंदुला हैराण केलं. बाहेर पडल्यावर समोरून साधारण सुटलेली बाई येताना दिसली की ती चंदुला विचारायची,"हिच्यापेक्शा मी किती जाड आहे"? आताशा तर कहरच झालाय, समोरून जाड बाई येताना दिसली की ती चंदुला कोपर रुतवून तिच्याकडे बघायला सांगते आणि डोळ्यानंच विचारते. एव्हाना चंदुलाही याची इतकी सवय झालीय की समोर जरा विस्तारीत फ़िगरवाली बाई दिसली रे दिसली की तो लगेच बायकोनं न विचारता ती त्या बाईच्या मागे आहे की पुढे हे सांगून टाकतो.
बाहुलि हरवलि

अलिकडे बाहुली म्हणजे बार्बी असंच समिकरण बनलंय. मला विचाराल तर मला बार्बी छोट्या मुलिंची बाहुली न वाटता मोठी बाईच वाटते. लांबसडक पाय, हात आणि आटोपशिर बांध्याची बार्बी मॊडेल भासते. आम्ही खेळलो त्या बाहुल्या म्हणजे गोबरया गालांच्या कुरळ्या केसांच्या गुटगुटीत, डोळ्यांची उघडझाप करणार्या असायच्या. दुकानातून अंगावर जो ड्रेस घालून यायच्या त्याच ड्रेसवर बिचार्या निमुट आमच्या भातुकलीत वर्षानु वर्ष खेळत असायच्या. बार्बीचं तसं नाही. या बाईसाहेबांचे नखरे तर विचारूच नका. यांच्या पायात उंच टाचेचे सॆंडल्स असतात, ओठांवर लिपस्टिक, अंगात तंग कपडे, हातात पर्स, मोबाईल, पेप्सी सगळं असतं. शिवाय यांचा अख्खा कपडेपटही विकत मिळतो. आमची बाहुली आमची बबडी असायची. तिला झोपवून, चुकवून आम्ही आईसारखे ऒफ़िसला जायचो. बार्बीशी खेळणारी लेक तिच्या सोबतिनं ्पार्टी पार्टी खेळते. बाहुलीच्या खेळातला निरागसपणा जाऊन आता तो स्टायलिश खेळ बनला आहे. भातुकलीतली गोबरी बाहुली हरवली आहे आणि तिची जागा या बार्बीनं घेतलीय याचं वाईट वाटून घ्यायचं की भातुकलीचा खेळही ब्रॆंडेड बनलाय याचं कौतुक करायचं हेच समजेनासं झालंय......
अलिकडे शब्दांशी तसं काही देणं घेणं राहिलं नाही
कोणी काही बोललं तरी टोचणं बोचणं उरलं नाही
ओशट ओशट मन आणि बोथट झाल्यात भावना
निसरड्या कानावरून शब्दांचे ओघळ नुसतेच घरंगळतात
--------------------------------------------------------------
परवा अचानकच जुना गाव वाटेत भेटला
बालपणिचा काळ सुखाचा चटका लावून गेला
जुन्या गावातलं घर माझं आता बरंच पुराणं झालंय
सुरकुतलेल्या म्हातार्यागत डोळ्यात आस पकडून श्वास मोजतंय
जुनेपाणाचं पोतेरं अंगावर घेऊन
शेवाळलेल्या भिंतिंतून आठवणी गच्च पकडून
उभं आहे बिचारं अजुनही पाऊसवारा झेलत
कोणी काही बोललं तरी टोचणं बोचणं उरलं नाही
ओशट ओशट मन आणि बोथट झाल्यात भावना
निसरड्या कानावरून शब्दांचे ओघळ नुसतेच घरंगळतात
--------------------------------------------------------------
परवा अचानकच जुना गाव वाटेत भेटला
बालपणिचा काळ सुखाचा चटका लावून गेला
जुन्या गावातलं घर माझं आता बरंच पुराणं झालंय
सुरकुतलेल्या म्हातार्यागत डोळ्यात आस पकडून श्वास मोजतंय
जुनेपाणाचं पोतेरं अंगावर घेऊन
शेवाळलेल्या भिंतिंतून आठवणी गच्च पकडून
उभं आहे बिचारं अजुनही पाऊसवारा झेलत
.........रात्र पावसाचि
गोष्ट म्हटलं तर जुनी आहे पण खूप खूप नाही. तशी ताजी ताजीच, तर मुंबईच्या पावसाची नुकतीच तोंडओळख झालेली होती. अशाच धमाधम पावसात चिमणिचा पहिला वाढदिवस आला. घरून फ़ोनवरफ़ोन यायला लागले. तिकडे तुमच्या जास्त ओळखी आहेतच कोठे इकडेच करू पहिला वाढदिवस दणक्यात. हो नाही करता करता एक दिवस बंधुराज साक्षात प्रकट झाले. अखेरीस सामान सुमान भरावंच लागलं. बरं नवरा आणि बंधुराज म्हणजे दोन टोकं. एकाला प्लॆनिंग कशाशी खातात माहित नाही आणि दुसरा म्हणजे शिस्तीची शिट्टी सतत फ़ुरफ़ुररवणारा. जायचं कसं म्हणजे कशानं याचा मस्त घोळ घालून झाल्यावर दुसरया रात्रीची बसची तिकिटं काढली. सकाळी कुंकू ऒफ़िसला निघून गेलं आणि बंधुराज त्यांच्या कामांना उरकायला बाहेर पडले. अकरा सव्वाअकराच्या सुमारास बंधुराजांचा फ़ोन आला की आपण बसनं नाही दुपारीच त्याच्या मित्राच्या गाडीतून निघायचं आहे. हे सगळं नवरयाच्या कानावर घातल्यावर अपेक्शेप्रमाणे त्याचं उचकून वगैरे झालं, पण करतो काय बायकोचा भाऊ त्यातून सख्खा मित्र म्हटल्यावर आला चुपचाप रजा टाकून. आमच्या कुंड्लितला तो दिवस त्या घटकेपर्यंत साधा सरळ होता. त्यानंतर त्या सरळ दिवसाची जी वाट लागली ती आजही आठवली तरी हसायला येतं.
तर बंधुराजांनी सांगितलं की त्याचा मित्र अंधेरीतलं काम आटोपून दोन वाजेपर्यंत स्टेशनवर येणार होता, तिथे आम्ही त्याला भेटणार होतो आणि पुढे त्याच्या पनवेलच्या फ़्लॆटवर असणारी त्याची गाडी घेऊन सांगलीला जाणार होतो. हे सगळं अचानक ठरल्यानं आम्ही जमेल तेव्हढी घाई करून सामान सुमान घेऊन स्टेशन गाठलं. निघताना घरी फ़ोन करून रात्री जेवायला येत असल्याचं सांगितलं. साधारण पावणेदोन वाजता स्टेशनवर आम्ही पोहोचलो. दोनचे सव्वा दोन आणि अडीच झाले तरी मित्रवर्यांचा पत्ता नाही. तीनचे साडे तीन झाले तरी काही समजेना. मोबाईल करावा तर तो बंद. एव्हाना नवर्यानं माझ्याकडे रागानं, संतापानं आणि वैतगानं बघून गुरगुरून झालेलं होतं. स्टेशनवरच्या गर्दीनं पिल्लू वैतागलं आणि जमेल तितकं इरीटेट करायला लागलं. या सगळ्यात बंधुराज मात्र डोक्यावर बर्फ़ाची लादी ठेवून होते. अखेरीस नवर्यानं शक्य तितक्या शांतपणानं आणि ठामपणानं घरी परत जाण्याचा निर्णय सुनावला. दोन तास फ़ुकटचा टाईमपास करून आम्ही परत घरी आलो. रात्रीची तिकिटंही कॆन्सल केलेली असल्यानं आता काय करायचं? हा प्रश्न होता. अखेरीस आमच्या रामप्यारीतून जायचं ठरलं. सामान उचलून खाली आलो, डिक्कीत सामान भरलं, स्टार्टर मारला आणि लक्शात आलं की एकावर एक फ़्री असल्यासारखी दोन्ही चाकं पंक्चर आहेत. ती काढून आणेपर्यंत आणखी तासभर गेला. परत वर येऊन चहापाणी झालं आणि बंधुराजांचा फ़ोन खणखणला. पलिकडून त्याचा परमप्रिय मित्र उलटा आम्हालाच झापत होता की तो स्टेशनवर आम्हाला शोधत आहे आणि आम्ही घरी काय करतोय म्हणून? मग परत डिकितलं सामान काढलं आणि रिक्शात भरून स्टेशन गाठल. तिथून टॆक्सी पकडली आणि पनवेलकडे निघालो. बंधुराज आणि त्यांच्या मित्रात व्यवस्थित मिसकम्युनिकेशन झालेलं होतं. त्यानं सांगितलं होतं की दोन अडीच वाजता तो अंधेरीला जाणार आहे. असो. केवळ एक कप चहासाठी आणि गाडीचं पंक्चर काढण्यासाठी आम्ही घरी गेल्यासारखे झालं. आता तुम्ही म्हणाल की काढलंच होतं पंक्चर तर जायचं नां स्वत:च्या गाडीतून. तर त्याचं कारण असं की मित्रवर्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती आणि त्यातून जावईबापूंना घेऊन जायची सुर्सुरी दोघांना आलेली. टॆक्सीत बसलो तर तिथे दुसरंच नाटक. टॆक्सीत आम्ही चौघं आणि आमचं प्रचंड सामान कसंबसं कोंबलेलं होतं. टॆक्सी सुरू झाल्यावर समजलं की एका बाजुला काचच नव्हती. तणतणत वैतागत कसेबसे पनवेलला पोहोचलो. तिथून ती ब्रॆण्डन्यू कार घेऊन निघालो. साधारण अर्ध्या तासानं नवर्यानं बंधुराजांना विचारलं की अरे आपण नक्की कोणत्या मार्गे जातोय? त्यावर त्यानं नाही पण मित्रवर्यांनी सांगितलं की पेणच्या कॊलेजात त्यांना कसलंसं एक पार्सल द्यायचं होतं, जाता जाता तेव्हढं काम करून पुढे निघायचं होतं. गाडीतून न उतरता केवळ गेटवरच्या माणसाकडे ते पार्सल देऊन जायचं असल्यानं वाकडी वाट केल्यानं जितका वेळ लागणार होता तोच. एव्हाना सगळेजण गाडीत सेटल झालो होतो. अंधार झाला होता. मस्त जुनी गाणी लागल्यानं कधी पेण आलं समजलंच नाही. पेण आलं, कॊलेज आलं, कॊलेजचं गेट आलं पण ज्याच्याकडे पार्सल द्यायचं तो माणून सोडाच काळं कुत्रंही दिसेना. आता परत फ़ोनाफ़ोनी सुरू झाली. तो माणूस आमची वाट बघून निघून गेला होता. आता तो जिथं होता तिथं जाऊन पार्सल देणं भाग असल्यानं परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. त्यानं सांगितलेल्या खुणा म्हणजे मोठा निर्माल्यकुंड, बाजार वगैरे सगळं सापडलं पण तो माणूस काही सापडला नाही. सरळ सरळ जाऊन अखेरीस रस्ता संपला. तासभर अशी डोके आणि घसेफ़ोड केल्यानंतर भक्ककन उजेड पडला की तो माणूस पेणमधला पत्ता मुळी सांगतच नव्हता. तो जो पत्ता सांगत होता ते ठिकाण होतं अलिबागमध्ये. हे समजल्यावर हसावं की रडावं हेच समजेना. पार्सल देणं अगदी निकडीचं असल्यानं आणि आता एव्हाना उशिर झालेला असल्यानं ऐंशी तिथं पंच्याऐंशी असा विचार करून ब्रॆण्ड न्यू गाडीची चाकं अलिबागकडे वळवली. एव्हाना पाऊस चांगलाच कोसळायला लागला होता. सकाळी केलेलं जेवण आणि संध्याकाळचा चहा सोडला तर पोटात काही नव्हतं त्यामुळे कडकडून भूक लागली होती. अखेरीस एका घरगुती पध्दतीच्या हॊटेलात आम्ही वैतागत जेवण उरकलं(तसं बघायला गेलं तर त्या संबंध दिवसांत आम्ही तेव्हढी एकच गोष्ट शहाणपणाची केली होती). आता घड्याळ बघायचंच नाही असं ठरवल्यानं किती वाजलेत याला काही महत्व नव्हतं. त्यात पुन्हा गंमंत अशी झाली की एव्हाना तीनपैकी दोन मोबाईलनी बॆटरी संपल्याच्या नावाखाली माना टाकल्या आणि एका मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं आम्ही आमच्या घरच्यांच्या आणि एकुणच सगळ्यांच्या संपर्कातून गेलेलो होतो. अंदाजानं मघाशी सांगितलेल्या खाणाखुणांवरून आम्ही चक्क अलिबागला त्या सदगहस्थांना शोधलंच आणि ते ऐतिहासिक पार्सल त्यांच्या स्वाधिन केलं. त्यावेळेस रात्रीची किमान अकरा बिकरा तरी वाजून गेले असणार. पार्सल दिल्यावर सुटलो एकदाचे करत पुन्हा गाडीत बसलो. आता सांगली आल्याशिवाय थांबायचं नाही असं ठरवून किल्ली फ़िरवली. तिथून निघून पंधरावीस मिनिटंच झाली असतील आणि प्रचंड म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस कोसळायला लागला. समोरचं दिसणं मुश्किल झालं आम्ही एका रेल्वेच्या गेट समोरून गेलो आणि भावानं निरागस चेहर्यानं सांगितलं, किंवा विचारलं की, मघाशी येताना हे गेट नव्हतं, आता कुठून आलं? आल्या रस्त्यानंच परत फ़िरायला गेलो आणि मस्तपैकी वाट चुकलो. बरं इतक्या पावसात आणि तेदेखिल इतक्या रात्री वाट विचारायला आम्हाला भेटणार तरी कोण? अखेरीस तसेच अंदाजा अंदाजानं गाडी पुढे नेत राहिलो. कुठे आलो होतो आणि कुठे चाललो होतो, काही पत्ताच लागत नव्हता. बरोबर लहान मुलगी असल्यानं आणखिनच टेन्शन आलं. थांबायचं आणि सकाळी जायचं म्हटलं तरी सोय नाही, कारण आजुबाजुला डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. रात्री झोपायला घरी जाणार होतो ते राहिलंच, पण सकाळच्या चहापर्यंत तरी पोहोचतोय की नाही याची शंका वाटायला लागली. मध्येच गाडी बंधुराजांनी चालवायला घेतली. अपरात्री कधीतरी त्याच्या अत्यानंदी आवाजानं तरतरी वाटली, त्यानं "खोपोलीकडे" असा बोर्ड वाचला. इतक्या तासांनंतर आम्ही ओळखिचं काहीतरी वाचलं होतं. काही नाही किमान आता खोपोली तरी गाठता येणार होतं. गरगर फ़िरून पहाटे कधीतरी आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलो. जितक्या अकल्पितपणे रस्ता चुकला होता त्याच अकल्पितपणानं रस्त्यावरही आलो होतो. अजून हुश्श करून सुटलो एकदाचे म्हणतोय तर पुढचं संकट कपडे करून तयारच उभं होतं. रात्री झालेल्या अपघातामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली होती. त्यातून मुंगीच्या पावलानं निघायला प्रचंड वेळ लागला. असं करता करता सांगलीला घरी पोहोचलो तेंव्हा सकाळचे अकरा वाजायला आले होते. आदल्या दिवशी अकरा वाजता यायला निघालेले आम्ही दुसर्या दिवशी अकरा वाजता पोहोचलो होतो. रात्री जेवायला येणार म्हणून जेवण तयार करून घरचे वाट बघत होते, पानं घेऊन तयार होती, गाद्या घालून तयार होत्या आणि आमचाच पत्ता नव्हता. त्यातून मोबाईल लागत नव्हते, बरोबर लहान मूल त्यामुळे घरचे जाम काळजीत होते. नवरा वैतागून अखेरीस म्हणालाच की चालत निघालो असतो तरी एव्हाना पोहोचलो असतो, पण करणार काय "एक तरफ़ खुदाई एक तरफ़ जोरूका भाई"....:)
तर बंधुराजांनी सांगितलं की त्याचा मित्र अंधेरीतलं काम आटोपून दोन वाजेपर्यंत स्टेशनवर येणार होता, तिथे आम्ही त्याला भेटणार होतो आणि पुढे त्याच्या पनवेलच्या फ़्लॆटवर असणारी त्याची गाडी घेऊन सांगलीला जाणार होतो. हे सगळं अचानक ठरल्यानं आम्ही जमेल तेव्हढी घाई करून सामान सुमान घेऊन स्टेशन गाठलं. निघताना घरी फ़ोन करून रात्री जेवायला येत असल्याचं सांगितलं. साधारण पावणेदोन वाजता स्टेशनवर आम्ही पोहोचलो. दोनचे सव्वा दोन आणि अडीच झाले तरी मित्रवर्यांचा पत्ता नाही. तीनचे साडे तीन झाले तरी काही समजेना. मोबाईल करावा तर तो बंद. एव्हाना नवर्यानं माझ्याकडे रागानं, संतापानं आणि वैतगानं बघून गुरगुरून झालेलं होतं. स्टेशनवरच्या गर्दीनं पिल्लू वैतागलं आणि जमेल तितकं इरीटेट करायला लागलं. या सगळ्यात बंधुराज मात्र डोक्यावर बर्फ़ाची लादी ठेवून होते. अखेरीस नवर्यानं शक्य तितक्या शांतपणानं आणि ठामपणानं घरी परत जाण्याचा निर्णय सुनावला. दोन तास फ़ुकटचा टाईमपास करून आम्ही परत घरी आलो. रात्रीची तिकिटंही कॆन्सल केलेली असल्यानं आता काय करायचं? हा प्रश्न होता. अखेरीस आमच्या रामप्यारीतून जायचं ठरलं. सामान उचलून खाली आलो, डिक्कीत सामान भरलं, स्टार्टर मारला आणि लक्शात आलं की एकावर एक फ़्री असल्यासारखी दोन्ही चाकं पंक्चर आहेत. ती काढून आणेपर्यंत आणखी तासभर गेला. परत वर येऊन चहापाणी झालं आणि बंधुराजांचा फ़ोन खणखणला. पलिकडून त्याचा परमप्रिय मित्र उलटा आम्हालाच झापत होता की तो स्टेशनवर आम्हाला शोधत आहे आणि आम्ही घरी काय करतोय म्हणून? मग परत डिकितलं सामान काढलं आणि रिक्शात भरून स्टेशन गाठल. तिथून टॆक्सी पकडली आणि पनवेलकडे निघालो. बंधुराज आणि त्यांच्या मित्रात व्यवस्थित मिसकम्युनिकेशन झालेलं होतं. त्यानं सांगितलं होतं की दोन अडीच वाजता तो अंधेरीला जाणार आहे. असो. केवळ एक कप चहासाठी आणि गाडीचं पंक्चर काढण्यासाठी आम्ही घरी गेल्यासारखे झालं. आता तुम्ही म्हणाल की काढलंच होतं पंक्चर तर जायचं नां स्वत:च्या गाडीतून. तर त्याचं कारण असं की मित्रवर्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती आणि त्यातून जावईबापूंना घेऊन जायची सुर्सुरी दोघांना आलेली. टॆक्सीत बसलो तर तिथे दुसरंच नाटक. टॆक्सीत आम्ही चौघं आणि आमचं प्रचंड सामान कसंबसं कोंबलेलं होतं. टॆक्सी सुरू झाल्यावर समजलं की एका बाजुला काचच नव्हती. तणतणत वैतागत कसेबसे पनवेलला पोहोचलो. तिथून ती ब्रॆण्डन्यू कार घेऊन निघालो. साधारण अर्ध्या तासानं नवर्यानं बंधुराजांना विचारलं की अरे आपण नक्की कोणत्या मार्गे जातोय? त्यावर त्यानं नाही पण मित्रवर्यांनी सांगितलं की पेणच्या कॊलेजात त्यांना कसलंसं एक पार्सल द्यायचं होतं, जाता जाता तेव्हढं काम करून पुढे निघायचं होतं. गाडीतून न उतरता केवळ गेटवरच्या माणसाकडे ते पार्सल देऊन जायचं असल्यानं वाकडी वाट केल्यानं जितका वेळ लागणार होता तोच. एव्हाना सगळेजण गाडीत सेटल झालो होतो. अंधार झाला होता. मस्त जुनी गाणी लागल्यानं कधी पेण आलं समजलंच नाही. पेण आलं, कॊलेज आलं, कॊलेजचं गेट आलं पण ज्याच्याकडे पार्सल द्यायचं तो माणून सोडाच काळं कुत्रंही दिसेना. आता परत फ़ोनाफ़ोनी सुरू झाली. तो माणूस आमची वाट बघून निघून गेला होता. आता तो जिथं होता तिथं जाऊन पार्सल देणं भाग असल्यानं परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. त्यानं सांगितलेल्या खुणा म्हणजे मोठा निर्माल्यकुंड, बाजार वगैरे सगळं सापडलं पण तो माणूस काही सापडला नाही. सरळ सरळ जाऊन अखेरीस रस्ता संपला. तासभर अशी डोके आणि घसेफ़ोड केल्यानंतर भक्ककन उजेड पडला की तो माणूस पेणमधला पत्ता मुळी सांगतच नव्हता. तो जो पत्ता सांगत होता ते ठिकाण होतं अलिबागमध्ये. हे समजल्यावर हसावं की रडावं हेच समजेना. पार्सल देणं अगदी निकडीचं असल्यानं आणि आता एव्हाना उशिर झालेला असल्यानं ऐंशी तिथं पंच्याऐंशी असा विचार करून ब्रॆण्ड न्यू गाडीची चाकं अलिबागकडे वळवली. एव्हाना पाऊस चांगलाच कोसळायला लागला होता. सकाळी केलेलं जेवण आणि संध्याकाळचा चहा सोडला तर पोटात काही नव्हतं त्यामुळे कडकडून भूक लागली होती. अखेरीस एका घरगुती पध्दतीच्या हॊटेलात आम्ही वैतागत जेवण उरकलं(तसं बघायला गेलं तर त्या संबंध दिवसांत आम्ही तेव्हढी एकच गोष्ट शहाणपणाची केली होती). आता घड्याळ बघायचंच नाही असं ठरवल्यानं किती वाजलेत याला काही महत्व नव्हतं. त्यात पुन्हा गंमंत अशी झाली की एव्हाना तीनपैकी दोन मोबाईलनी बॆटरी संपल्याच्या नावाखाली माना टाकल्या आणि एका मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं आम्ही आमच्या घरच्यांच्या आणि एकुणच सगळ्यांच्या संपर्कातून गेलेलो होतो. अंदाजानं मघाशी सांगितलेल्या खाणाखुणांवरून आम्ही चक्क अलिबागला त्या सदगहस्थांना शोधलंच आणि ते ऐतिहासिक पार्सल त्यांच्या स्वाधिन केलं. त्यावेळेस रात्रीची किमान अकरा बिकरा तरी वाजून गेले असणार. पार्सल दिल्यावर सुटलो एकदाचे करत पुन्हा गाडीत बसलो. आता सांगली आल्याशिवाय थांबायचं नाही असं ठरवून किल्ली फ़िरवली. तिथून निघून पंधरावीस मिनिटंच झाली असतील आणि प्रचंड म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस कोसळायला लागला. समोरचं दिसणं मुश्किल झालं आम्ही एका रेल्वेच्या गेट समोरून गेलो आणि भावानं निरागस चेहर्यानं सांगितलं, किंवा विचारलं की, मघाशी येताना हे गेट नव्हतं, आता कुठून आलं? आल्या रस्त्यानंच परत फ़िरायला गेलो आणि मस्तपैकी वाट चुकलो. बरं इतक्या पावसात आणि तेदेखिल इतक्या रात्री वाट विचारायला आम्हाला भेटणार तरी कोण? अखेरीस तसेच अंदाजा अंदाजानं गाडी पुढे नेत राहिलो. कुठे आलो होतो आणि कुठे चाललो होतो, काही पत्ताच लागत नव्हता. बरोबर लहान मुलगी असल्यानं आणखिनच टेन्शन आलं. थांबायचं आणि सकाळी जायचं म्हटलं तरी सोय नाही, कारण आजुबाजुला डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. रात्री झोपायला घरी जाणार होतो ते राहिलंच, पण सकाळच्या चहापर्यंत तरी पोहोचतोय की नाही याची शंका वाटायला लागली. मध्येच गाडी बंधुराजांनी चालवायला घेतली. अपरात्री कधीतरी त्याच्या अत्यानंदी आवाजानं तरतरी वाटली, त्यानं "खोपोलीकडे" असा बोर्ड वाचला. इतक्या तासांनंतर आम्ही ओळखिचं काहीतरी वाचलं होतं. काही नाही किमान आता खोपोली तरी गाठता येणार होतं. गरगर फ़िरून पहाटे कधीतरी आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलो. जितक्या अकल्पितपणे रस्ता चुकला होता त्याच अकल्पितपणानं रस्त्यावरही आलो होतो. अजून हुश्श करून सुटलो एकदाचे म्हणतोय तर पुढचं संकट कपडे करून तयारच उभं होतं. रात्री झालेल्या अपघातामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली होती. त्यातून मुंगीच्या पावलानं निघायला प्रचंड वेळ लागला. असं करता करता सांगलीला घरी पोहोचलो तेंव्हा सकाळचे अकरा वाजायला आले होते. आदल्या दिवशी अकरा वाजता यायला निघालेले आम्ही दुसर्या दिवशी अकरा वाजता पोहोचलो होतो. रात्री जेवायला येणार म्हणून जेवण तयार करून घरचे वाट बघत होते, पानं घेऊन तयार होती, गाद्या घालून तयार होत्या आणि आमचाच पत्ता नव्हता. त्यातून मोबाईल लागत नव्हते, बरोबर लहान मूल त्यामुळे घरचे जाम काळजीत होते. नवरा वैतागून अखेरीस म्हणालाच की चालत निघालो असतो तरी एव्हाना पोहोचलो असतो, पण करणार काय "एक तरफ़ खुदाई एक तरफ़ जोरूका भाई"....:)
Labels:
अशी माणसं तशी माणसं
दिवस असे की......
हॆलो.....हॆलो.....डॊक्टर......ऎडमिट होऊ? लगेच......हॆलो....हॆलो....आई मी ऎडमिट होतेय, तू हॊस्पिटलमध्ये पोहोच.....हॆलो.....(फ़ोन १,२,३,४,५,६).......आय थिंक आता वाट बघण्यात अर्थ नाही, वी मस्ट गो फ़ॊर सीझेरीयन......टिक, टिक, टिक, टिक, टिक.......अभिनंदन , मुलगा झाला.....अभिनंदन......वेलकम बॆक होम.....वेळ:पहाटेचे चार- ट्यॆंहॆं...शू केली वाटतं बदला लंगोट, वेळ:४.०५ मिनिटं पुन्हा शू, ४.२०- शी, ४.२१ भूक, ४.५० शी, परत शू परत भूक....... सकाळचा प्रहर....परत तेच.....दुपारचा प्रहर...पुन्हा तेच....संध्याकाळ...तेच....रात्र....तेच.....मध्यरात्र.....तेच....दिवस एक.....दिवस दोन... दिवस तीन...किती दिवस झाले कोणास ठा्वूक रूटिन मात्र तेच.....काक्वा, मावश्या, आत्या, अनुभवी मित्रमंडळी....अगं सुरवातीचे थोडे दिवस असंच असतं, मग हळू हळू सेटल होईल.......कितवा दिवस माहित नाही, रूटिनमध्ये बदल इतकाच की आता झोपलेला नसेल तर खेळत असतो, वेळ: रात्रीचे २.३०, ३.३०, ३.१५, पहाटेचे चार म्हणजे कोणतिही....पहिल्यांदा उत्साहानं सोबत जागणारी मंडळी आता हळू हळू पळ काढतायत.....करंट स्टेटस:अकेले हम अकेले तुम....
Subscribe to:
Posts (Atom)

