प्रचंड हुशार माणूस
ज्यांची मुलाखत घ्यायची ती माणसं दोन प्रकारची असतात एक तर ती खरोखरच हुशार असतात आणि आपल्याला त्यांच्याशी गप्पा व्हाव्याशा वाटतात. दुसरा प्रकार म्हणजे ही माणसं "भयंकर हुशार" असतात आणि आपण त्यांच्याशी गप्पा माराव्यात असं त्यांना वाटत असतं. अशा दुसर्या प्रकारातली माणसं भेटली की, "हेल" समजतो. असाच एक भयंकर हुशार प्राणी एकदा भेटला. (या माणसांचिही एक गंमत असते, त्यांची शिफ़ारस करणारी इतरच कोणीतरी असतात आपण बेसावधपणानं बळी पडतो आणि मग या माणसांच्या कचाट्यात सापडतो.) या प्राण्यानं कसलं तरी संशोधन केलेलं होतं, प्रसिध्दीला लाथाडणारा अशी त्याची ओळख माझ्यापर्यंत आली आणि अशा माणसाचं कार्य लोकांसमोर येणं किती गरजेचं आहे मला अगदी बेसावध क्षणाला पटलं. एका रम्य सकाळी (तेही रविवारच्या हो!) हे महाशय त्यांच्या लॆपटॊसह प्रकटले. प्रसिधिला लाथाडणारे हे महाशय अगदी तयारीनं आलेले होते. त्यांच्या संशोधनातलं काय काय प्रसिध्द व्हावं हे तर त्यांनी सविस्तरपणानं आणलंच होतं त्याशिवाय ते कोणत्या भाषेत मांडलं जावं याचंही त्यांच्याकडे टिपण होतं. प्रत्येक मुद्द्यानंतर ते तो मुद्दा नेमक्या कोणत्या शब्दात मांडला जावा याची माहिती देत होते. सुरवातीला मी दूर्लक्ष करत राहिले कारण ते माझ्या खास ओळखितल्यांचे नातलग होते. असं एकदम ताडकन बोलणं मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी शालजोडीतली हाणायच्या उद्देशानं त्यांना म्हटलं, असं करा नाही तरी मला सध्या अजिबात वेळ नाही, तुम्हीच तुमची सविस्तर मुलाखत तयार करा आणि मला द्या पुढे काय करायचं मी बघेन. हा जोडा त्यांना बहुदा समजलाच नाही, ते म्हणाले की त्यापेक्षा तुम्हीच मुलाखत लिहून मला वाचायला द्या, त्यात बदल करून "सुधारून" मी तुम्हाला पाठवेन. साधारण दीड तासानंतर सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर त्यांना सांगितलं की हे सगळं छापायचं झालं तर एक पान भरेल आणि त्यासाठी जाहिरात विभाग तुमच्याकडून कॊलमसेंटीमिटरच्या रेटनं बिल वसूल करेल. आत्मस्तुतीत मग्न झालेल्या या महाशयांना कोणताच जोडा लागत नव्हता, बायकोला दणदणीत पगार असल्यानं त्यांचं संशोधन कार्य चाललेलं होतं, बाता जगाला सुधारण्याच्या आणि घराचा भार बायकोच्या डोक्यावर देऊन हे महाशय असे मोकाट. बरं संशोधन म्हणाल तर ते ही भरीव नाही. उथळ पाण्याचा हा खळखळाट काही मिनिटात लक्षात आल्यावर पुढे बोलण्याची उमेदच संपली. एरवी अनोळखी माणसाच्या बाबतीत असं झालं असतं तर त्याला कटवणं फ़ार कठीण नव्हतं पण इथे मामला दगडाखाली हात सापडल्यासारखा झालेला होता. संशोधनकार्याची सविस्तर माहिती झाली, कौटुंबिक माहिती झाली, तथाकथित समाजकार्य झालं आणि इतकं सगळं झाल्यावर त्यांना त्यांच्यातल्या कलागुणांचीही तारीफ़ हवी असल्यानं त्यांनी त्यांच्या मोजक्या कविता दाखवल्या, वर म्हणाले बघा असा संशोधक तुम्हाला भेटला होता का कधी? जो इतक्या रूक्ष संशोधनकार्यातही त्याच्यातल्या काव्यप्रतिभेची पालवी अलवार हातानं जपतो आहे (हे सगळे शब्द त्यांचेच आहेत) कमालिच्या थकव्यानं म्हटलं नाही "तुमच्यासारखा" माणूसच मला पहिल्यांदा दिसतो आहे. यावर ते जाम उत्साहीत झाले आणि म्हणाले, मग याचा उल्लेख करायला विसरू नका. दोन तासांचे टोले देऊन काटा पुढे जायला लागला तसा मला इतका मानसिक थकवा आला की अखेरीस सगळे शिष्टाचार विसरून त्यांना म्हटलं सध्यासाठी ही मुलाखत इथे थांबवुया बाकीचं जरा सविस्तर नंतर बोलू. अगदी सुदैवानं त्याचवेळेस मोबाईल वाजला, त्यावर फ़ोनकंपनिची सुंदरी केकटत होती की अमूक रिंग टोन घ्या आणि तमूक घ्या. संधीचा फ़ायदा उचलत मी अगदी घाईत उठले आणि मला जायला हवं जरा तातडीचं काम आहे म्हणून या भयंकर हुशार माणसाच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्या दिवशी पहिल्यांदाच मला वेळीअवेळी केकाटणार्या मोबाईल सुंदरीबद्दल माया दाटून आली.
पुन्हा तेच?
मुंबईच्या माथीच इतकी संकटं का? या शहराला कोणी वाली आहे की नाही? इतजे दिवस बॊम्ब फ़ुटत होते सामान्य चाकरमन्याच्या पायात यावेळेस मात्र सोकॊल्ड एलाईट क्लासही या शहरात सुरक्षित नाही हे जाणवल्यावर पायाखालची जमिन नव्यानं सरकली. रोज सकाळी लोकलसाठी धावताना आजचा दिवस कसा जाईल याची चिंता पोटात दडपत धावणं कधी संपणार आहे की नाही? असं काही घडलं की घराबाहेर असणारया आपल्या माणसांची खुशाली समजेपर्यंतचे क्षण आणि ते माणूस घरी परतेपर्यंतचे तास मुंबईकर जीव मुठीत घेऊन घालवतात. दुसरया दिवशी नाईलाजानं पुन्हा त्याच रूटिनमध्ये परतावं लागतं आणि सगळं जग याला मुंबई स्पिरिट म्हणून नावाजतं. कसलं आलंय स्पिरिट? या शहरात कोणाच्याही पुढच्या मिनिटाच्या श्वासाची शाश्वती राहिलेली नाही. निर्लज्ज पुढारी आणि त्यांचं आंधळं सरकार यांनी सगळा देश जणू विकायला काढलाय. सगळ झाल्यावर पाकिस्तानला तंब्या दिल्या आणि दाऊदच्या अटकेची मागणी केली की कडा जवाब दिल्याच्या मस्तीत हे लोक पुढे चालत रहातात. दाऊदच्या गोवरया मसणात जायची वेळ आली तरी यांना तो सापडत नाही. तिकडे अमेरीका सद्दामला मुसक्या बांधून आणते. या देशातले सगळेच्या सगळे राजकारणी देश विकून विमान पकडून दाऊदप्रमाणेच एक दिवस फ़रारी होतील. एखाद दुसरा नेता सोडला तर सब घोडे बारा टक्के असा प्रकार झालाय. कोणाकडे पहायचं आम्ही? आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांची वैयक्तिक प्रगती होत असताना आम्ही मात्र जिथे होतो तिथेच आहोत. यांना ए पासून झेड पर्यंतच्या सुरक्षा आहेत त्यामुळे यांच्या बुडाला काय आच लागणार? जीव जातो तो सामान्यांचा. यावेळेस तर बर्ड फ़्ल ची साथ आल्यासारखे सगळे राजकारणी बाश्कळ पकपक करत आहेत. एकेकाचा उद्दामपणा माणूसकिला लाज आणणारा आहे. वर जे वागतोय, बोलतोय त्याबद्दल ना खंत, ना खेद ना लाज. लाज वाटते आम्हाला अशा माणसांना आमचा "प्रतिनिधी" म्हणविण्याची. आम्ही असे नाही. शेजारच्या घरी मयत झालं तर आमच्या चेहरयावर चार दिवस हसू येत नाही आणि हे नेते खुशाल हसरया चेहरयानं बाईट देत सरेआम फ़िरत आहेत. अशा वेळेस खरं तर संयमानं परिस्थिती हाताळायला हवी. सामान्यांचा संताप लक्षात घेऊन त्यावर समजुतदारपणानं फ़ुंकर घालायला हवी. उलट यांचा उद्दामपणाच दिसून येतोय. तुम्हाला खुर्ची दिलिय ती आमच्या हितांचं रक्षण करण्यासाठी याची जाण ठेवा. या नेत्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या काढून घेऊन त्यांना लोकलनं प्रवास करण्याची सक्ती करायला हवी. मुंबईकरांवर झालेल्या या आणखी एका हल्ल्यानं चीड आलीय आणि कमालिचं हताशही वाटतंय? आम्हाला खरंच कोणी वाली राहिला नाही का?
यांचं काय करावं?
काहीजण खरंच खुप हुशार असतात आणि काहीजण इतके हुशार असतात की कधी कधी त्यांची हुशारीच त्यांच्या मार्गात आडवी यायला लागते. बरं पुन्हा स्वत:बद्दल यांची मतं इतकी पक्की असतात की त्यांना जरा खाली खेचून जमिनिवर आणणंही शक्य असत नाही. अशा हुशार लोकांच्या मुलाखती घेण्याचं कर्मकठीण काम पत्रकाराला करावं लागतं तेंव्हा जी हालत होते ती "जावे त्याच्या वंशा" की कायसं त्याप्रमाणे असते.
पत्रकारीता करताना ज्या अनेक गोष्टी नशिबातून चुकत नाहीत त्यापैकी एक म्हणजे मुलाखत घेणे. बरं नामवंत व्यक्तीची किंवा खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मुलाखत घेताना एक प्रकारचा आनंद होतो मात्र बर्याचदा काही सेटिंगमुळे सोम्या गोम्याची मुलाखत घ्यायची वेळ आली की अगदी डोक्यावरचे केस उपटून घ्यायची वेळ येते. पत्रकार म्हणून काम करत असताना तर असे अनेक नमुने भेटत रहातात. पत्रकार ही एक व्यक्ती अशी असते की जिला सगळ्या विषयातलं सगळं समजतं किंवा बहुतेकवेळा किमान आव आणण्यापुरतं तरी प्रत्येक विषयातलं समजतं असं भासवावं लागतं. त्यातून एखाद्या व्यक्तीची मुलाखत "असाईनमेंट" म्हणून आपल्या कुंडलीत मांडलेली असेल तर विचारूच नका. अनोळखी माणसांच्या मुलाखती घेणं मला तरी जाम मनोरंजक आणि त्याचवेळेस काटा आणणारं काम वाटतं. अशा मुलाखती एकतर अगदी टाईमपास करणार्या होतात किंवा जाम पकाऊ. उमेदवारीच्या काळात तर अशा भन्नाट अनुभवांचा प्रचंड साठाच माझ्याजवळ जमा झाला. सुरवातिला मीं मुलाखत घ्यायला जायची म्हटल्यावर प्रामाणिकपणानं त्या व्यक्तीबद्दलची किमान माहिती काढून जायची पण नंतर नंतर लक्षात आलं की बर्याचदा या मुलाखती मार्केटिंगवाल्यांच्या सेटिंगमुळे घडवून आणल्या जातात.
विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत असताना एकदा अशिच चमालध झाली. तोपर्यंत मी साक्षात अशी मुलाखत कोणाचिच घेतली नव्हती. कार्यालयात आल्यावर नावापुढे असाईनमेंट होती की, "ह.भ.प. अमूक ढमूक यांची मुलाखत." विषयाचं वाटप करणार्यानं एका ओळीत विषय मिटवून टाकला असला तरी माझ्यापुढे प्रश्नांची जंत्री. मुळात हे ह.भ.प. कोण, त्यांचं वय काय, त्यांचं कार्य काय आणि त्यांची मुलाखत घेण्याचं प्रयोजन काय? ते कुठे भेटतील आणि त्यांना काय विचारायचं हा तर खुपच दूरचा मुद्दा. आजुबाजुच्या चारजणांना विचारलं तर त्यांनी एक चमत्कारीक हसू देण्याव्यतिरीक्त काहीच मदत केली नाही. अखेरीस एक मार्केटिंगवालाच मदतिला धावला. त्याला ही व्यक्ती चक्क माहिती होती (असा त्याच्या बोलण्यावरून माझा समज झाला) त्याच्या बाईकवरून आम्ही ह.भ.प. महाशय भेटण्याच्या संभवित जागांवर जाऊन आलो.अर्धा एक तास भटकल्यानंतर अखेरीस गावात कुठेतरी पारायण सोहळा चालला होता तिथे ते भेटले. बरं मांडवातले सगळेच मला ह.भ.प. वाटत असल्यानं आम्हाला हवे असलेले कसे शोधायचे हा उपप्रश्न निर्माण झाला. अखेरीस एका व्यक्तीनं आम्हाला हव्या असणार्या ह.भ.प. ना भेटवलं. त्यांच्या समोर बसल्यावर मनात पहिला विचार आला की सुटले एकदाची आता पटपट प्रश्न विचारून आटपावं एकदाचं. सुरवात करावी म्हणून सरसावले आणि लक्षात आलं की नक्की काय विचारायचं यांना? आणि कशाबद्दल मुलाखत आहे? याचा पत्ताच नाहीए. बरं पारायण, किर्तन किंवा असल्या गोष्टींशी दूरचाही संबंध नसल्यानं मनात जरा भितीच होती की समजा समोर बसलेली व्यक्ती या क्षेत्रातली महान, आदरणिय व्यक्ती असायची आणि माझ्याकडून काही कमी जास्त विचारलं गेलं तर? मी आपली बिचकत बिचकत सुरवात केली. उगाच आपलं इकडचं तिकडचं बोलणं सुरू केलं. समोरून काहीही प्रतिसाद नाही. वाटलं आजोबा मनातल्या मनात नामस्मरण करतायत की काय. मी आणि मिस्टर मार्केटिंगवाले एकमेकाडे हैराण होऊन बघत असतानाच खोलीत एकजण चहा घेऊन आला तो भक्तीभावानं आम्हाला म्हणाला की,"आबांना ऐकाय जरा कमी येतंय तवा मोठ्यानी बोला" मी माझ्यापरीनं मोठ्यांदा बोलून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मिस्टर मार्केटिंगवाल्यानं प्रयत्न केले त्याला जरा जरा यश आलं कारण आता आजोबा किमान "अं"? असा प्रश्न विचारायला लागले पण पहिल्या दहापाच प्रश्नांना "अं"? हेच उत्तर मिळाल्यावर आमची उमेदच खचली. इतक्यात मघासचे चहावाले परत एकदा देवासारखे धावून आले. त्यांना मिस्टर मार्केटिंगवाल्यानं पकडलं आणि त्यालाच प्रश्न विचारले. ज्याची माहिती त्याला नव्हती ती त्यानं आबांच्या शब्दश: "कानपटिला" बसून विचारली. तासाभरानंतर मुलाखत संपली आणि आम्हाला समजलं की अखेरच्या दिवशी समिती आमच्या पेपरात अर्धपान जाहिरात देणार असल्यानं या मुलाखतिचा घाट घालण्यात आला होता. पत्रकारीता शिकत असताना "मुलाखतिचे तंत्र आणि मंत्र" यावर अखंड साठ मिनिटं भजन ऐकल्याचं तात्पर्य त्यादिवशी समजलं की ते सगळं मार्क मिळविण्यासाठी असलं तरी प्रत्यक्षात मुलाखत हे प्रकरण भलतंच असतं. कार्यालयात आल्यावर कितीतरीवेळ आधी हसायलाच येत होतं. एका वरिष्ठाला हा प्रकार सांगितल्यावर त्यानं दिलेलं बोधामत तर आणखिनच चविष्ठ होतं तो म्हणाला ह.भ.प. यांची मुलाखत घ्यायला गेलेली जगातली तू एकमेव पत्रकार असशिल. विषय बघून ठरवायचं की प्रत्यक्ष जायला हवं की फोनवर काम होईल. वर पुन्हा प्रत्यक्ष जायला कोणी सांगितलं म्हणून हजेरी घेतली ती वेगळीच.बरं आता जाऊन आलोच आहोत तर लिहावी चांगली दणदणीत मुलाखत म्हणून रंगवून रंगवून मुलाखत खरडून ट्रे मध्ये टाकली आणि दुसर्या दिवशी उत्सुकतेनं पेपर उघडला तर दोन कॊलमात विषय मिटवून टाकला होता. सुरवातिची काही वाक्य आणि अखेरचा टप्पा यातच ह.भ.प. यांची मुलाखत संपवून उपसंपादक महोदयांनी मुलाखतिचं चिज केलं. मुलाखत या प्रांतातला माझा हा पहिला आणि माझ्यामते तरी भन्नाट अनुभव म्हणून सांगितला. आणखी काही नमुनेदार मुलाखतींबाबत सांगितल्याशिवाय रहावत नाहीए पण असं धावत पळत सांगण्यात काही अर्थ नाही. तेंव्हा त्यांच्याबद्दल जरा विस्तारानं नंतर.
पत्रकारीता करताना ज्या अनेक गोष्टी नशिबातून चुकत नाहीत त्यापैकी एक म्हणजे मुलाखत घेणे. बरं नामवंत व्यक्तीची किंवा खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मुलाखत घेताना एक प्रकारचा आनंद होतो मात्र बर्याचदा काही सेटिंगमुळे सोम्या गोम्याची मुलाखत घ्यायची वेळ आली की अगदी डोक्यावरचे केस उपटून घ्यायची वेळ येते. पत्रकार म्हणून काम करत असताना तर असे अनेक नमुने भेटत रहातात. पत्रकार ही एक व्यक्ती अशी असते की जिला सगळ्या विषयातलं सगळं समजतं किंवा बहुतेकवेळा किमान आव आणण्यापुरतं तरी प्रत्येक विषयातलं समजतं असं भासवावं लागतं. त्यातून एखाद्या व्यक्तीची मुलाखत "असाईनमेंट" म्हणून आपल्या कुंडलीत मांडलेली असेल तर विचारूच नका. अनोळखी माणसांच्या मुलाखती घेणं मला तरी जाम मनोरंजक आणि त्याचवेळेस काटा आणणारं काम वाटतं. अशा मुलाखती एकतर अगदी टाईमपास करणार्या होतात किंवा जाम पकाऊ. उमेदवारीच्या काळात तर अशा भन्नाट अनुभवांचा प्रचंड साठाच माझ्याजवळ जमा झाला. सुरवातिला मीं मुलाखत घ्यायला जायची म्हटल्यावर प्रामाणिकपणानं त्या व्यक्तीबद्दलची किमान माहिती काढून जायची पण नंतर नंतर लक्षात आलं की बर्याचदा या मुलाखती मार्केटिंगवाल्यांच्या सेटिंगमुळे घडवून आणल्या जातात.
विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत असताना एकदा अशिच चमालध झाली. तोपर्यंत मी साक्षात अशी मुलाखत कोणाचिच घेतली नव्हती. कार्यालयात आल्यावर नावापुढे असाईनमेंट होती की, "ह.भ.प. अमूक ढमूक यांची मुलाखत." विषयाचं वाटप करणार्यानं एका ओळीत विषय मिटवून टाकला असला तरी माझ्यापुढे प्रश्नांची जंत्री. मुळात हे ह.भ.प. कोण, त्यांचं वय काय, त्यांचं कार्य काय आणि त्यांची मुलाखत घेण्याचं प्रयोजन काय? ते कुठे भेटतील आणि त्यांना काय विचारायचं हा तर खुपच दूरचा मुद्दा. आजुबाजुच्या चारजणांना विचारलं तर त्यांनी एक चमत्कारीक हसू देण्याव्यतिरीक्त काहीच मदत केली नाही. अखेरीस एक मार्केटिंगवालाच मदतिला धावला. त्याला ही व्यक्ती चक्क माहिती होती (असा त्याच्या बोलण्यावरून माझा समज झाला) त्याच्या बाईकवरून आम्ही ह.भ.प. महाशय भेटण्याच्या संभवित जागांवर जाऊन आलो.अर्धा एक तास भटकल्यानंतर अखेरीस गावात कुठेतरी पारायण सोहळा चालला होता तिथे ते भेटले. बरं मांडवातले सगळेच मला ह.भ.प. वाटत असल्यानं आम्हाला हवे असलेले कसे शोधायचे हा उपप्रश्न निर्माण झाला. अखेरीस एका व्यक्तीनं आम्हाला हव्या असणार्या ह.भ.प. ना भेटवलं. त्यांच्या समोर बसल्यावर मनात पहिला विचार आला की सुटले एकदाची आता पटपट प्रश्न विचारून आटपावं एकदाचं. सुरवात करावी म्हणून सरसावले आणि लक्षात आलं की नक्की काय विचारायचं यांना? आणि कशाबद्दल मुलाखत आहे? याचा पत्ताच नाहीए. बरं पारायण, किर्तन किंवा असल्या गोष्टींशी दूरचाही संबंध नसल्यानं मनात जरा भितीच होती की समजा समोर बसलेली व्यक्ती या क्षेत्रातली महान, आदरणिय व्यक्ती असायची आणि माझ्याकडून काही कमी जास्त विचारलं गेलं तर? मी आपली बिचकत बिचकत सुरवात केली. उगाच आपलं इकडचं तिकडचं बोलणं सुरू केलं. समोरून काहीही प्रतिसाद नाही. वाटलं आजोबा मनातल्या मनात नामस्मरण करतायत की काय. मी आणि मिस्टर मार्केटिंगवाले एकमेकाडे हैराण होऊन बघत असतानाच खोलीत एकजण चहा घेऊन आला तो भक्तीभावानं आम्हाला म्हणाला की,"आबांना ऐकाय जरा कमी येतंय तवा मोठ्यानी बोला" मी माझ्यापरीनं मोठ्यांदा बोलून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मिस्टर मार्केटिंगवाल्यानं प्रयत्न केले त्याला जरा जरा यश आलं कारण आता आजोबा किमान "अं"? असा प्रश्न विचारायला लागले पण पहिल्या दहापाच प्रश्नांना "अं"? हेच उत्तर मिळाल्यावर आमची उमेदच खचली. इतक्यात मघासचे चहावाले परत एकदा देवासारखे धावून आले. त्यांना मिस्टर मार्केटिंगवाल्यानं पकडलं आणि त्यालाच प्रश्न विचारले. ज्याची माहिती त्याला नव्हती ती त्यानं आबांच्या शब्दश: "कानपटिला" बसून विचारली. तासाभरानंतर मुलाखत संपली आणि आम्हाला समजलं की अखेरच्या दिवशी समिती आमच्या पेपरात अर्धपान जाहिरात देणार असल्यानं या मुलाखतिचा घाट घालण्यात आला होता. पत्रकारीता शिकत असताना "मुलाखतिचे तंत्र आणि मंत्र" यावर अखंड साठ मिनिटं भजन ऐकल्याचं तात्पर्य त्यादिवशी समजलं की ते सगळं मार्क मिळविण्यासाठी असलं तरी प्रत्यक्षात मुलाखत हे प्रकरण भलतंच असतं. कार्यालयात आल्यावर कितीतरीवेळ आधी हसायलाच येत होतं. एका वरिष्ठाला हा प्रकार सांगितल्यावर त्यानं दिलेलं बोधामत तर आणखिनच चविष्ठ होतं तो म्हणाला ह.भ.प. यांची मुलाखत घ्यायला गेलेली जगातली तू एकमेव पत्रकार असशिल. विषय बघून ठरवायचं की प्रत्यक्ष जायला हवं की फोनवर काम होईल. वर पुन्हा प्रत्यक्ष जायला कोणी सांगितलं म्हणून हजेरी घेतली ती वेगळीच.बरं आता जाऊन आलोच आहोत तर लिहावी चांगली दणदणीत मुलाखत म्हणून रंगवून रंगवून मुलाखत खरडून ट्रे मध्ये टाकली आणि दुसर्या दिवशी उत्सुकतेनं पेपर उघडला तर दोन कॊलमात विषय मिटवून टाकला होता. सुरवातिची काही वाक्य आणि अखेरचा टप्पा यातच ह.भ.प. यांची मुलाखत संपवून उपसंपादक महोदयांनी मुलाखतिचं चिज केलं. मुलाखत या प्रांतातला माझा हा पहिला आणि माझ्यामते तरी भन्नाट अनुभव म्हणून सांगितला. आणखी काही नमुनेदार मुलाखतींबाबत सांगितल्याशिवाय रहावत नाहीए पण असं धावत पळत सांगण्यात काही अर्थ नाही. तेंव्हा त्यांच्याबद्दल जरा विस्तारानं नंतर.
नवरा येई मदतिला तोची दिवाळी दसरा
पुन्हा एकवार नवरा पुराण. काय करणार? जगातल्या सगळ्या पुरूषांना विनोद करण्यासाठी बायका पुरतात तसंच आम्हा बायकांनाही फ़ावल्या वेळेत काही लिहायचं म्हटलं की नवरयाचे प्रतापच सुचतात त्याला काय करायचं?आज आवरू उद्या आवरू करत घरात पसारा प्रचंड झाल्यावर कुठून आवरावं हे कळेनासं झालं की नवरयाला साद घालण्याशिवाय पर्यायच रहात नाही. संकटसमयी एखादा भक्त जसा गलितगात्र होउन भगवंताला साद घालतो तशीच साद नवरोबांना घातल्यावर तोही बि़चारा तत्परतेनं धावत येतो. त्याचा हेतू इतका प्रचंड चांगला असतो की त्या मदती दरम्यान जे घोळ होतात त्याबद्दल त्याच्यावर चिडावं की आपल्या डोक्यात दगड पडल्यासारखं त्याला मदतिला बोलवलं म्हणून स्वत:वरच चिडावं काही समजत नाही.
जरा दिवाळी तोंडावर आलीय म्हणून कधी नव्हे ते पडदे वगैरे धुवायचं काम अस्मादिकांनी कामवालीकडे न सोपविता स्वत:कडे घेतलं. आता उंचीवरचे पडदे काढण्याइतकी उंची नसल्यानं घरातल्या एकमेव जिवंत शिडीला साकडं घातलं. पडदे काढण्यासाठी पायाखाली खुर्ची हवी होती म्हणून ती ओढताना त्यावरचा कपड्यांचा ढीग ढबाककन खाली पडला. झालं. आमची शाळा सुरू. ही काय कपडे ठेवायची पध्दत झाली? अमूक आणि तमूक. इतकी छान सुवर्णसंधी लाभल्यावर गाडी आमच्या जवळपास दर रविवारच्या कपडे खरेदीवर घसरली नसती तरच नवल.इतकं सगळं होईपर्यंत पडदे काढायला चढलेला नवरा बारसहित उतरतो. म्हणजे पुन्हा बार चढविण्याचं काम वाढलं नाही का? बरं काही बोलायची सोयही नाही. किचन स्वच्छ करण्यासाठी किचमधली ट्रॊली बाहेर काढ म्हट्लं तर अशी बाहेर काढली की ती आत घालविण्यासाठी सुताराला बोलवायला लागलं. पुन्हा ट्रॊली काढतानाही याचा तोंडाचा पट्टा चालूच, हॊटेलातून पार्सल मागवल्यानंतर रिकामे डबे घासून त्यात काही बाही ठेवण्याची माझी मध्यमवर्गिय सवय, तर डब्यांचा हा ढीग पाहून त्याचं डोकं तडकलं, अगं किती हे डबे, कशाला हवेत हे रिकामे डबे? टाकून द्यावेत ना वेळच्यावेळी. असं म्हणत त्यानं भराभर डबे मोठ्या पिशवीत गोळा करायला सुरवातही केली.जीव तुटला हो तटतट. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. किचन मधून हकलण्यासाठी व्हॆक्युम क्लिनर लाव म्हटलं तर याला जाम उत्साह चावला. हातात घुईं वाजणारा व्हॆक्युम क्लिनर घेउन दे दणादण सग्ळीकडे सैरवैरा धावत सुटला. या गोंधळात सोफसेट भिंत सोडून मैदानात आला, सेंटर टेबल पार बाहेर टेरेसमध्ये गेलं, वॊलयुनिटनं त्याची जागा सोडली थोडक्यात सगळ्या गोष्टिंनी त्यांची आसनं सोडली आणि अंदाधुंधी माजल्यासारख्या त्या इकडे तिकडे पस्ररल्य. सगळं घर घाम गाळून स्वच्छ केल्यानंतर त्याला व्हॆक्युम क्लिनर स्वच्छ करण्याची उचकी लागली. कसं करायचं हे सांगायच्या आत पिशवी काढून कचर्याच्या डब्यात ती उलटीही झाली होती. त्यातून उडालेली धूळ त्याच्या तोंडावर आणि आजुबाजुला पसरली. म्हणजे आता या सगळ्याच्या सफ़ाईचं जास्तिचं काम उगवलं. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. घर आवरण्यापेक्षा जसं होतं तसंच बरं होतं म्हणायची वेळ आली. पुन्हा दोन तासात मला शिस्त कशी नाही हे त्यानं प्रत्येक काम करताना पटवून दिलं. आता मात्र रडायला यायला लागलं. एकतर आवरासावरीचा उत्साह ओसरला होता आणि पोटात भुकेनं कल्लोळ माजवला होता. आता आवर बाबा तुझं सफ़ाई अभियान असं म्हणावसं वाटलं. किल्ली दिलेलं खेळणं कसं किल्ली उतरेपर्यंत वाजतच रहातं वाजतच रहातं तसा हा किल्ली मारल्या सारखा आवरतच राहिला आणि सगळं पसरतच राहिला. अखेर एकदाची किल्ली उतरली आणि दमलो बुवा म्हणून हुश्श करून बसला. इतक्या पसारयात जेवणाचे बारा वाजले होतेच त्यामुळे बाहेरून मागा्वलेलं भुरकून खाताना म्हणतो कसा, बघ, आज मी होतो म्हणून तुझं आवरून झालं. नाहीतर तुझ्या एकटिच्यानं झालं असतं का सगळं? जेवण झाल्यावर हा घोरत पडला आणि मी त्यानं पसरलेलं आवरत बसले. दिवसभर आवरल्यानंतर डोकं इतकं भणभणायला लागलं की रात्री स्वप्नातही मी आवरतच होते.
जरा दिवाळी तोंडावर आलीय म्हणून कधी नव्हे ते पडदे वगैरे धुवायचं काम अस्मादिकांनी कामवालीकडे न सोपविता स्वत:कडे घेतलं. आता उंचीवरचे पडदे काढण्याइतकी उंची नसल्यानं घरातल्या एकमेव जिवंत शिडीला साकडं घातलं. पडदे काढण्यासाठी पायाखाली खुर्ची हवी होती म्हणून ती ओढताना त्यावरचा कपड्यांचा ढीग ढबाककन खाली पडला. झालं. आमची शाळा सुरू. ही काय कपडे ठेवायची पध्दत झाली? अमूक आणि तमूक. इतकी छान सुवर्णसंधी लाभल्यावर गाडी आमच्या जवळपास दर रविवारच्या कपडे खरेदीवर घसरली नसती तरच नवल.इतकं सगळं होईपर्यंत पडदे काढायला चढलेला नवरा बारसहित उतरतो. म्हणजे पुन्हा बार चढविण्याचं काम वाढलं नाही का? बरं काही बोलायची सोयही नाही. किचन स्वच्छ करण्यासाठी किचमधली ट्रॊली बाहेर काढ म्हट्लं तर अशी बाहेर काढली की ती आत घालविण्यासाठी सुताराला बोलवायला लागलं. पुन्हा ट्रॊली काढतानाही याचा तोंडाचा पट्टा चालूच, हॊटेलातून पार्सल मागवल्यानंतर रिकामे डबे घासून त्यात काही बाही ठेवण्याची माझी मध्यमवर्गिय सवय, तर डब्यांचा हा ढीग पाहून त्याचं डोकं तडकलं, अगं किती हे डबे, कशाला हवेत हे रिकामे डबे? टाकून द्यावेत ना वेळच्यावेळी. असं म्हणत त्यानं भराभर डबे मोठ्या पिशवीत गोळा करायला सुरवातही केली.जीव तुटला हो तटतट. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. किचन मधून हकलण्यासाठी व्हॆक्युम क्लिनर लाव म्हटलं तर याला जाम उत्साह चावला. हातात घुईं वाजणारा व्हॆक्युम क्लिनर घेउन दे दणादण सग्ळीकडे सैरवैरा धावत सुटला. या गोंधळात सोफसेट भिंत सोडून मैदानात आला, सेंटर टेबल पार बाहेर टेरेसमध्ये गेलं, वॊलयुनिटनं त्याची जागा सोडली थोडक्यात सगळ्या गोष्टिंनी त्यांची आसनं सोडली आणि अंदाधुंधी माजल्यासारख्या त्या इकडे तिकडे पस्ररल्य. सगळं घर घाम गाळून स्वच्छ केल्यानंतर त्याला व्हॆक्युम क्लिनर स्वच्छ करण्याची उचकी लागली. कसं करायचं हे सांगायच्या आत पिशवी काढून कचर्याच्या डब्यात ती उलटीही झाली होती. त्यातून उडालेली धूळ त्याच्या तोंडावर आणि आजुबाजुला पसरली. म्हणजे आता या सगळ्याच्या सफ़ाईचं जास्तिचं काम उगवलं. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. घर आवरण्यापेक्षा जसं होतं तसंच बरं होतं म्हणायची वेळ आली. पुन्हा दोन तासात मला शिस्त कशी नाही हे त्यानं प्रत्येक काम करताना पटवून दिलं. आता मात्र रडायला यायला लागलं. एकतर आवरासावरीचा उत्साह ओसरला होता आणि पोटात भुकेनं कल्लोळ माजवला होता. आता आवर बाबा तुझं सफ़ाई अभियान असं म्हणावसं वाटलं. किल्ली दिलेलं खेळणं कसं किल्ली उतरेपर्यंत वाजतच रहातं वाजतच रहातं तसा हा किल्ली मारल्या सारखा आवरतच राहिला आणि सगळं पसरतच राहिला. अखेर एकदाची किल्ली उतरली आणि दमलो बुवा म्हणून हुश्श करून बसला. इतक्या पसारयात जेवणाचे बारा वाजले होतेच त्यामुळे बाहेरून मागा्वलेलं भुरकून खाताना म्हणतो कसा, बघ, आज मी होतो म्हणून तुझं आवरून झालं. नाहीतर तुझ्या एकटिच्यानं झालं असतं का सगळं? जेवण झाल्यावर हा घोरत पडला आणि मी त्यानं पसरलेलं आवरत बसले. दिवसभर आवरल्यानंतर डोकं इतकं भणभणायला लागलं की रात्री स्वप्नातही मी आवरतच होते.
जानुची गोष्ट : २
...........झालं ते झालं म्हणत त्या दिवसापासून जान्हवीनं घरातून लक्षच काढलं. एकाएकी तिला समरची आठवण यायला लागली. आपला निर्णय चुकला ही शंका ममाशी झालेल्या वादावादीनंतर पहिल्यांदाच आली आणि लग्नात कौतुकं पुरवून घेणार्या धनुला पाहून तिला खात्रीच पटली की आपण त्यागा बिगाच्या नशेतच होतो...फक्त आपण....धनू, आई, समर सगळे उघडे डोळे असणारे होते आणि आपल्याच डोळ्यावर गुंगी चढली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तिनं कोणाकोणाकडून समरचा पत्ता घेतला, त्याचा ई-मेल मिळवला आणि थरथरत्या बोटांनी त्याला एका आवेशातच मेल लिहिली. तिच्या मेलला उत्तर म्हणून समरनं फोटो पाठवले होते, त्याच्या टुमदार बंगलिचे, ज्यात कदाचित जान्हवी राहिली असती, बंगलिसमोरच्या सुंदर बगिच्याचे, जो कदाचित जानुच्या हातांनी फुलला असता, सगळ चित्र समर-जान्हवीनं पाहिलेल्या चित्रासारखंच होतं, अचूक....मात्र त्यातल समरसोबतचा हसरा समाधानी चेहरा जान्हविचा नव्हता, त्या हसर्या चेहर्याशी चिमण्या मुठींनी मस्ती करणारा गोंडस जीव जान्हवीचा अंश नव्हता...चित्राची एक बाजू परिचित होती आणि दूसरी मन भयभित करणारी. तिच्या मेलला उत्तर देण्याची तसदिही समरनं घेतली नव्हती, तिनं जीव तोडून लिहिलेल्या शब्दांना उत्तर म्हणून त्यानं पाठवलेली चार छायाचित्रं तिला सैरभैर करून गेली. यथावकाश फोटोतल्या समाधानी चेहरयाचं आणि कडेवरच्या बाळाचं नावही समजलं. ज्यांच्या तिचा काहीच संबंध नव्हता. धनुच्या संसाराला मदत म्हणून गेलेली ममा तिकडेच रमली. तिच्या आयुष्यातलं धनुचं स्थान पहिल्यांदाच जानुला टोचायला लागलं. एरवी त्यांचं गुळपीठ हा तिच्या थट्टेचा विषय असायचा आता संतापाचा झाला.....
......आयुष्य कोणासाठी थांबतं? आपल्या गतीनं त्याला जितकं पुढे सरकायचं तितकं ते सरकतच रहातं. जानुचं आयुष्यही सरकत राहिलं, तिला नकोसं झालेलं असलं तरी. धनुचं लग्न झाल्यावरचा रितेपणाही हळू हळू सवयिचा झाला. आपली गरज खरं तर कोणालाच नसते हे सगळे आपण निर्माण केलेले पाश असतात....धनुच्या बायकोचं आणि ममाचं रितीप्रमाणे पटेनासं झालं. सुरवातिला त्यांना ममाची गरज होती. तितके दिवस त्यांनी तिच्याशी गोड बोलून काम साधून घेतलं. नंतर नंतर वाद व्हायला लागले. धनुची बायको, श्र्वेता, त्याला सुचवू लागली की तिकडे जानू एकटीच आहे. सगळ्या घरावर कब्जा करेल आपल्या माघारी, मग काय कराल? त्यापेक्षा तुमच्या आईला तिकडे पाठवा, त्यांच्यावर वचक राहिल. धनुलाही हे पटलं त्यानं निमित्त काढून आईला परत पाठवलं. तिला समजलं नव्हतं असं नाही पण धनुशिवाय तिच्या असण्याला तिच्यालेखी काही किंमत नव्हती. सगळं आयुष्य त्याच्याकडे पाहून काढल्यावर आता ती कोणासाठी जगणार होती? जानुकडे ती परतल्यावर या दोघिंचं असं आयुष्य पहिल्यांदाच चालू झालं. दोन टोकांवर रहाणार्या दोघीजणी आधीच एकमेकीसाठी परक्या होत्या. त्यात ममाला अलिकडे काय झालं होतं कोणास ठावून जानुचे पैसेही ती घरासाठी वापरायची नाही. धनुच्या पैशांची वाट पहात रहायची. सगळ्याचा एकीकडे त्रास होत असतानाच सवयही होत होती. श्र्वेताला दिवस गेल्याचे कळल्यावर ममा त्या आनंदाच्या भरात चक्क जानुशी चांगलं बोलली, गोड जेवण बनवलं आणि तिच्याचसोबत जेवायला बसली. दुसर्या दिवशी सकाळी उठून तिनं बॆग भरली, जानुनं विचारलं की बॆग का भरलीस? तर म्हणाली, धनुचा कधिही फोन येईल, तिच्या मदतिला जायला नको? जानूनं विचारलं,"अगं तिची आई आहे नां करायला? तू कशाला दगदग करतेस?" यावर कुठेतरी हरवलेली ममा म्हणाली,"एकच एक मुलगा, त्याचं सगळं व्यवस्थित झालं की मी डोळे मिटायला मोकळी"......
श्र्वेताला मुलगी झाली आणि आईनं तिच्या गर्भारपणातल्या तिसर्या महिन्यापासून सगळं घर सांभाळलं. श्र्वेताच्या आईनं बाळंतपण करायला जमणार नाही म्हणून सांगितलं तर हिनं आनंदानं केलं. बाळाला सांभाळणं, स्वयंपाक सगळं ममा जातिनं करायची. धनुची मुलगी, ईशा वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाला गेलेली जानू धनुच्या संसारात पहिल्यांदाच जात होती. बारशाच्यावेळेस अनोळखी माणसांच्या गर्दित हरवलेली जानू अंधार्या गॆलरीत एकटिच उभी होती आणि तिच्या कानावर आतल्या खोलितले संवाद पडले, आतल्या लोकांना बहुदा जानुच्या तिथं असण्याची कल्पना नसावी."अजून किती दिवस सासुला ठेवून घेणार आहेस? आलिय नां तुझी नणंद तिच्यासोबत पाठव तिला." एका पोक्त बाईचा आवाज होता."हो, नां, अगदी गळ्यातच पडल्यात लग्न झाल्यापासून. जरा म्हणून मोकळीक नाही. सतत आपलं धनू धनू करत यांच्यापाठी असतात. उगाच एका माणसाचा जास्तिचा खर्च आम्हीच काय म्हणून सोसायचा? तिकडे त्या मॆडम घरखर्चाला पैसेही देत नाहीत बहुतेक. सतत यांना फोन करत असतात, इतके पैसे दे आणि तितके पैसे दे. यावेळेस मी सरळ सांगणार आहे की आई दोघांची आहे नां, मग खर्चही निम्मा करा. शिवाय आमच्या घरावर कब्जा करून बसल्यात ते वेगळंच. आता या तिथे आयुष्यभर रहाणार म्हणजे ते घर विकताही येणार नाही आणि आम्ही तिकडे जाणार नाही म्हणजे आम्हाला त्याचा काही उपयोगही नाही. इकडे जरा मोठं घर घ्यायचा विचार होता पण तिकडचं घर विकलं तर पैसे वरच्यावर उभे रहातील नां, कुठलं काय या बाईसाहेब जोवर त्या घरात आहेत तोवर आम्हाला काही एक पैसा मिळू द्यायच्या नाहीत." हा आवाज नक्की श्र्वेताचा होता. खरं तर इतकं ऐकल्यावर संतापानं जानुच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं होतं. एकदा वाटलं सरळ समोर जाऊन जाब विचारावा पण मग तिनं ठरवलं की इथेच उभं राहून आणखी काय गरळ ओकतायत ते ऐकावं. आता श्र्वेताची आई म्हणाली,"तरी बरं, अधून मधून गोड बोलून तुम्ही दोघांनी सासुचे दागिने तरी किमान तुमच्याजवळ ठेवून घेतले ते. नाहितर सगळंच तुझी देखणी नणंद हिरावून घेउन बसली असती. स्वत:च्या रूपाचा इतका गर्व आहे तर लग्न का करत नाही? अजुनही किमान एखादा बिजवर तरी नक्की मिळेल" यावर श्र्वेता म्हणाली,"अगं त्यांना म्हणे कोणीतरी मुलानं धोका दिला त्यामुळे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नापर्यंत प्रकरण आलेलं असताना तो पळून गेला म्हणे परदेशात, प्रकरण इतकंच होतं की पुढे गेलं होतं कोणास ठावूक" "तरी बरं बाई श्र्वेता तू बाळंतपण सगळं तुझ्या सासुच्या गळ्यात घातलंस, शिवाय वर्षभर बाळही सांभाळायला लावलंस. तेव्हढेच पैसे वाचले बेबीसिटिंगचे"यावर दोघी खिदळत बाहेर पडल्या. संतापानं लाही लाही झालेली जानू बाहेर आली. चार लोकांत मिरवणार्या श्र्वेताला बघून तिला तिडिक आली. एरवी वन्सं वन्सं करत गोड बोलणार्या श्र्वेताचा खरा चेहरा असा असेल याची तिला कल्पनाही नव्हती. कार्यक्रम संपल्यावर सगळे बसलेले असताना तिनं धनुला सांगितलं की सकाळी ती जाणार आहे आणि सोबत ममालाही घेउन जाणार आहे, हे सांगताना तिनं श्र्वेताकडे सहेतूकपणानं पहात म्हटलं की,"नाही तरी आता दुसरं मूल होईपर्यंत बेबीसिटिंगचं काम संपलेलंच आहे नाही का? शिवाय तिकडे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला आई हवीच नाही का?" माझ्याकडे आणि घराकडे यावर विशेष जोर देत तिनं श्र्वेताच्या आईकडेही जळजळीत नजरेनं पाहिलं. धनूला काहिच कल्पना नसल्यानं तो आपला म्हणत राहिला की,"पहिल्यांदाच आली आहेस तर रहा की आणखी काही दिवस. आलीस तेंव्हा तर म्हणत होतीस की निवांत राहिन म्हणून आता एकदमच काय झालं?" यावर काही न बोलता तिनं आईला बॆग भरायला सांगितली आणि अचानक आठवल्यासारखं धनुला म्हणाली की," धनू , इतके दिवस का माहित नाही पण ममा तू पाठवलेले पैसेच वापरायची, मी तिला दिलेले पैसे तिनं तिच्या कपाटात जसेच्यातसे ठेवले आहेत. पण आता तूच तिला सांग. महिन्याचा घरचा सगळा खर्च मी पाहिन आणि तिला खर्चाचे पैसे दोघेही निम्मे निम्मे देत जाऊ" आता मात्र श्र्वेता आणि तिची आई चपापल्या आणि सरळ स्वयंपाकघरातच निघून गेल्या. आईच्या मनात तिथेच रहायचं होतं पण जान्हविच्या रेट्यापुढे तिचं काही चाललं नाही आणि धनू किंवा त्याची बायकोही तिला रहा म्हणाले नाहीत तेंव्हा नाईलाजानं ती यायला तयार झाली. प्रवासात जानुनं ममाला श्र्वेता आणि तिच्या आईच्यातला संवाद जसाच्या तसा सांगितला त्यावर ममा म्हणाली,"तुझं आपलं काहीतरीच जान्हवी. चार माणसं म्हटली की चार तर्हा आल्या, त्याचा इतका बाऊ करू नये. त्या काही वेगळं बोलत असतील आणि तू आपलं अर्धं काही ऐकून डोक्यात राख घालून घेतली असशिल. धनुच्या सासुरवडिच्या लोकांना तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं ओळखते. सोन्यासारखी माणसं आहेत. तू ऊगाच नाही त्या शंका पसरवू नको" हे ऐकून जानुच्या डोक्यात तिडिकच गेली. ती ममाला म्हणाली,"तू, तुझा धनू आणि त्याची बायको, खड्ड्यात जा. मला वाईट वाटलं म्हणून बोलले. आज बोलले ते अखेरचं समज." त्या दिवसापासून जानुच्या आयुष्यातून घरगुत समस्यांना पूर्णविराम मिळाला....
......आयुष्य कोणासाठी थांबतं? आपल्या गतीनं त्याला जितकं पुढे सरकायचं तितकं ते सरकतच रहातं. जानुचं आयुष्यही सरकत राहिलं, तिला नकोसं झालेलं असलं तरी. धनुचं लग्न झाल्यावरचा रितेपणाही हळू हळू सवयिचा झाला. आपली गरज खरं तर कोणालाच नसते हे सगळे आपण निर्माण केलेले पाश असतात....धनुच्या बायकोचं आणि ममाचं रितीप्रमाणे पटेनासं झालं. सुरवातिला त्यांना ममाची गरज होती. तितके दिवस त्यांनी तिच्याशी गोड बोलून काम साधून घेतलं. नंतर नंतर वाद व्हायला लागले. धनुची बायको, श्र्वेता, त्याला सुचवू लागली की तिकडे जानू एकटीच आहे. सगळ्या घरावर कब्जा करेल आपल्या माघारी, मग काय कराल? त्यापेक्षा तुमच्या आईला तिकडे पाठवा, त्यांच्यावर वचक राहिल. धनुलाही हे पटलं त्यानं निमित्त काढून आईला परत पाठवलं. तिला समजलं नव्हतं असं नाही पण धनुशिवाय तिच्या असण्याला तिच्यालेखी काही किंमत नव्हती. सगळं आयुष्य त्याच्याकडे पाहून काढल्यावर आता ती कोणासाठी जगणार होती? जानुकडे ती परतल्यावर या दोघिंचं असं आयुष्य पहिल्यांदाच चालू झालं. दोन टोकांवर रहाणार्या दोघीजणी आधीच एकमेकीसाठी परक्या होत्या. त्यात ममाला अलिकडे काय झालं होतं कोणास ठावून जानुचे पैसेही ती घरासाठी वापरायची नाही. धनुच्या पैशांची वाट पहात रहायची. सगळ्याचा एकीकडे त्रास होत असतानाच सवयही होत होती. श्र्वेताला दिवस गेल्याचे कळल्यावर ममा त्या आनंदाच्या भरात चक्क जानुशी चांगलं बोलली, गोड जेवण बनवलं आणि तिच्याचसोबत जेवायला बसली. दुसर्या दिवशी सकाळी उठून तिनं बॆग भरली, जानुनं विचारलं की बॆग का भरलीस? तर म्हणाली, धनुचा कधिही फोन येईल, तिच्या मदतिला जायला नको? जानूनं विचारलं,"अगं तिची आई आहे नां करायला? तू कशाला दगदग करतेस?" यावर कुठेतरी हरवलेली ममा म्हणाली,"एकच एक मुलगा, त्याचं सगळं व्यवस्थित झालं की मी डोळे मिटायला मोकळी"......
श्र्वेताला मुलगी झाली आणि आईनं तिच्या गर्भारपणातल्या तिसर्या महिन्यापासून सगळं घर सांभाळलं. श्र्वेताच्या आईनं बाळंतपण करायला जमणार नाही म्हणून सांगितलं तर हिनं आनंदानं केलं. बाळाला सांभाळणं, स्वयंपाक सगळं ममा जातिनं करायची. धनुची मुलगी, ईशा वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाला गेलेली जानू धनुच्या संसारात पहिल्यांदाच जात होती. बारशाच्यावेळेस अनोळखी माणसांच्या गर्दित हरवलेली जानू अंधार्या गॆलरीत एकटिच उभी होती आणि तिच्या कानावर आतल्या खोलितले संवाद पडले, आतल्या लोकांना बहुदा जानुच्या तिथं असण्याची कल्पना नसावी."अजून किती दिवस सासुला ठेवून घेणार आहेस? आलिय नां तुझी नणंद तिच्यासोबत पाठव तिला." एका पोक्त बाईचा आवाज होता."हो, नां, अगदी गळ्यातच पडल्यात लग्न झाल्यापासून. जरा म्हणून मोकळीक नाही. सतत आपलं धनू धनू करत यांच्यापाठी असतात. उगाच एका माणसाचा जास्तिचा खर्च आम्हीच काय म्हणून सोसायचा? तिकडे त्या मॆडम घरखर्चाला पैसेही देत नाहीत बहुतेक. सतत यांना फोन करत असतात, इतके पैसे दे आणि तितके पैसे दे. यावेळेस मी सरळ सांगणार आहे की आई दोघांची आहे नां, मग खर्चही निम्मा करा. शिवाय आमच्या घरावर कब्जा करून बसल्यात ते वेगळंच. आता या तिथे आयुष्यभर रहाणार म्हणजे ते घर विकताही येणार नाही आणि आम्ही तिकडे जाणार नाही म्हणजे आम्हाला त्याचा काही उपयोगही नाही. इकडे जरा मोठं घर घ्यायचा विचार होता पण तिकडचं घर विकलं तर पैसे वरच्यावर उभे रहातील नां, कुठलं काय या बाईसाहेब जोवर त्या घरात आहेत तोवर आम्हाला काही एक पैसा मिळू द्यायच्या नाहीत." हा आवाज नक्की श्र्वेताचा होता. खरं तर इतकं ऐकल्यावर संतापानं जानुच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं होतं. एकदा वाटलं सरळ समोर जाऊन जाब विचारावा पण मग तिनं ठरवलं की इथेच उभं राहून आणखी काय गरळ ओकतायत ते ऐकावं. आता श्र्वेताची आई म्हणाली,"तरी बरं, अधून मधून गोड बोलून तुम्ही दोघांनी सासुचे दागिने तरी किमान तुमच्याजवळ ठेवून घेतले ते. नाहितर सगळंच तुझी देखणी नणंद हिरावून घेउन बसली असती. स्वत:च्या रूपाचा इतका गर्व आहे तर लग्न का करत नाही? अजुनही किमान एखादा बिजवर तरी नक्की मिळेल" यावर श्र्वेता म्हणाली,"अगं त्यांना म्हणे कोणीतरी मुलानं धोका दिला त्यामुळे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नापर्यंत प्रकरण आलेलं असताना तो पळून गेला म्हणे परदेशात, प्रकरण इतकंच होतं की पुढे गेलं होतं कोणास ठावूक" "तरी बरं बाई श्र्वेता तू बाळंतपण सगळं तुझ्या सासुच्या गळ्यात घातलंस, शिवाय वर्षभर बाळही सांभाळायला लावलंस. तेव्हढेच पैसे वाचले बेबीसिटिंगचे"यावर दोघी खिदळत बाहेर पडल्या. संतापानं लाही लाही झालेली जानू बाहेर आली. चार लोकांत मिरवणार्या श्र्वेताला बघून तिला तिडिक आली. एरवी वन्सं वन्सं करत गोड बोलणार्या श्र्वेताचा खरा चेहरा असा असेल याची तिला कल्पनाही नव्हती. कार्यक्रम संपल्यावर सगळे बसलेले असताना तिनं धनुला सांगितलं की सकाळी ती जाणार आहे आणि सोबत ममालाही घेउन जाणार आहे, हे सांगताना तिनं श्र्वेताकडे सहेतूकपणानं पहात म्हटलं की,"नाही तरी आता दुसरं मूल होईपर्यंत बेबीसिटिंगचं काम संपलेलंच आहे नाही का? शिवाय तिकडे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला आई हवीच नाही का?" माझ्याकडे आणि घराकडे यावर विशेष जोर देत तिनं श्र्वेताच्या आईकडेही जळजळीत नजरेनं पाहिलं. धनूला काहिच कल्पना नसल्यानं तो आपला म्हणत राहिला की,"पहिल्यांदाच आली आहेस तर रहा की आणखी काही दिवस. आलीस तेंव्हा तर म्हणत होतीस की निवांत राहिन म्हणून आता एकदमच काय झालं?" यावर काही न बोलता तिनं आईला बॆग भरायला सांगितली आणि अचानक आठवल्यासारखं धनुला म्हणाली की," धनू , इतके दिवस का माहित नाही पण ममा तू पाठवलेले पैसेच वापरायची, मी तिला दिलेले पैसे तिनं तिच्या कपाटात जसेच्यातसे ठेवले आहेत. पण आता तूच तिला सांग. महिन्याचा घरचा सगळा खर्च मी पाहिन आणि तिला खर्चाचे पैसे दोघेही निम्मे निम्मे देत जाऊ" आता मात्र श्र्वेता आणि तिची आई चपापल्या आणि सरळ स्वयंपाकघरातच निघून गेल्या. आईच्या मनात तिथेच रहायचं होतं पण जान्हविच्या रेट्यापुढे तिचं काही चाललं नाही आणि धनू किंवा त्याची बायकोही तिला रहा म्हणाले नाहीत तेंव्हा नाईलाजानं ती यायला तयार झाली. प्रवासात जानुनं ममाला श्र्वेता आणि तिच्या आईच्यातला संवाद जसाच्या तसा सांगितला त्यावर ममा म्हणाली,"तुझं आपलं काहीतरीच जान्हवी. चार माणसं म्हटली की चार तर्हा आल्या, त्याचा इतका बाऊ करू नये. त्या काही वेगळं बोलत असतील आणि तू आपलं अर्धं काही ऐकून डोक्यात राख घालून घेतली असशिल. धनुच्या सासुरवडिच्या लोकांना तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं ओळखते. सोन्यासारखी माणसं आहेत. तू ऊगाच नाही त्या शंका पसरवू नको" हे ऐकून जानुच्या डोक्यात तिडिकच गेली. ती ममाला म्हणाली,"तू, तुझा धनू आणि त्याची बायको, खड्ड्यात जा. मला वाईट वाटलं म्हणून बोलले. आज बोलले ते अखेरचं समज." त्या दिवसापासून जानुच्या आयुष्यातून घरगुत समस्यांना पूर्णविराम मिळाला....
जानुची गोष्ट
जानूनं दार उघडलं आणि रितूला "गुड नाईट" म्हणून निरोप दिला. रितूनं विचारलंही,"आर यू ओके बेबी?" त्यावर जानून हसत सांगितलं,"वन थाऊंजंड पर्सेंट, बा<<<य सी यू टु...मा....रो" म्हणत दार धाडकन लावून घेत ती तशीच भेलकांडत आत आली. तेव्हढ्या वेळातही बाजुच्या म्हातार्यानं दार उघडून तिच्या येण्याची दखल घेतल्याचं तिला जाणवलं आणि तोंडून कधी नव्हे ते प्रकट शिवी आली,"स्साला". कशीबशी आत येत ती बेडवर आडवी झाली आणि उलट सुलट विचारांच्या गरगरीनं झोपेच्या आधीन झाली. मनातले उलटे सुलटे विचार तिला झोपू देत नव्हते आणि मद्याचा अंमल तिला जागू देत नव्हता. अशाच भिरभिर अवस्थेत कधीतरी ती झोपून गेली. सकाळी जाग आली तेंव्हा सुलभामावशी घर आवरत होती. खरं तर तिला जाग आलीय की नाही हेच आधी समजलं नाही. तिच्या संवेदना जणू संपून गेल्या होत्या. मात्र "काफी करू का ताई?" असा सुलभामावशीचा परिचित आवाज कानावर पडला आणि खरंच जाग आलीय याची खात्री पटली. तिच्या अवताराकडे पाहून सुलभामावशी काळजिनं म्हणाल्या,"तब्येत बरी नाही का ताई?" तिला काही उत्तर न देताच जानू बाथरुममध्ये शिरली. गरम पाण्याच्या शॊवरखाली बरं वाटेल म्हणून उभी राहिली आणि उलट विचारांचा गुंता आणखिनच सुटा व्हायला लागला. सुधेंदू तर म्हणाला होता की,’एक दोन पेगनंतर यु विल बी ऒल राईट, ये गम, तकलिप सब हवा में उड जाएगा बेबी. हॆव इट’ रात्री काहीकाळ वाटलंही तसंच पण मग घरात आल्यावर पुन्हा त्याच गुंत्यात मेंदू गुरफटत गेलाच. आता अजून डोळे उघडले नाहीत तोवर परत तेच विचार आणि तेच कढ....रात्री गाडीत रितू विचारत होती,"तुला आशु गेलाय याचं वाईट वाटतंय की तो समरसारखाच गेला याचं? तू तुलना करतेयस तुझ्याच भूतकाळाची तुझ्या वर्तमानाशी. समर वॊज पास्ट आणि आशुही लवकरच तुझा पास्ट बनेल, कोणाच्या जाण्यानं कोणाचं आयुष्य थांबत नाही जान्हवी आणि ते थांबुही नाही. कोणा समर आणि आशुपुरतं आयुष्य जगायला देवानं तुला जन्माला घातलेलं नाही. जिसको जाना है बेबी वो जायेगाही तकलिफ में रहेगी तू. समरने अपनी जिंदगी ढुंढ ली आशुभी ढुंढही लेगा. तू अकेली हो जाएगी. ज्यादा सोच मत...." हे आणि असंच काही बाही रितू जानुला समजावत राहिली होती. त्यातलं काही डोक्यात शिरत होतं काही नव्हतं. सगळं पटत होतं आणि तरीही पटत नव्हतं. रात्री झोपेतही सतत आशु आणि समर आळीपाळीन दिसत राहिले. समर म्हणत होता,"कम ऒन जानू, तू एकटीच परदेशी सेटल होणार नाहीएस. तू तिकडे आलीस याचा अर्थ तू तुझी नाती तोडलीस, जबाबदार्या झटकल्यास असा होत नाही. थिंक शोनू. मी जाणार आहेच तुही बरोबर असावस असं वाटतं. आलीस तर तुझ्याबरोबर नाहीतर तुझ्याशिवाय....प्लिज जानू नाही म्हणू नको" समुनं लाख विनवण्या केल्य होत्या. पण त्यावेळेस आपल्याच डोक्यावर कसलं भूत चढलं होतं देव जाणे. भूत म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाहून नेण्याची नशा चढली होती. बाबांच्यामाघारी बाबा बनून घराला सावरण्याची धुंदी. घरी येणारे जाणारे, नातेवाईक सगळेचजण नावाजत म्हणत, "जानू भक्कम आहे म्हणून बरं आहे." ते ऐकताना आणखी कणखर वाटायचं. धाकट्या भावाला, धनुला, शिकवायचं आणि त्याच्या पायावर उभं करायचं स्वप्न होतं. शिकवायचं म्हणजे खरं तर त्याचं शिक्षण शेवटच्या पायरीवर होतं. तरीही आपल्याशिवाय धनू आणि ममाला कोणी नाही ही जाणिव मनात कुठेतरी सुखीही करायची. त्याच धुंदीत तिनं समरला नकार दिला. धनुलाही भरून वगैरे आलं होतं, "यु डिझर्व्ह मच बेटर" म्हणत त्यानं धीर दिला होता. समरला नकार दिला तो दिवस जानू कधिही विसरली नाही. अखेरचा आणि निकराचा प्रयत्न करावा म्हणून समरनं तिला भेटायला बोलवलं होतं मात्र त्यावेळेस तर आणखिनच ठामपणानं नकार देउन जानू घरी आली होती. समरला ती म्हणाली होती,"मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय समर. आता माझं पाऊल मागे ओढू नकोस" समर गेला त्या दिवशी तिला एक अनामिक रितेपणा जाणवायला लागला आणि नकळत डोळे घळघळा वहायला लागले. ममाला समजलं होतं कदाचित जानू रडतेय ते पण ती काही बोलली नाही. जानुला मनातून वाटत होतं की मामा येउन पाठीवरून हात फिरवून म्हणेल,"सगळं ठीक होईल बेटा" पण मामा खोलीत आली आणि जानुला झोपलेली पाहून दार ओढून घेउन परत गेली. त्यामुळे तिला आणखिनच तुटल्यासारखं झालं. समर गेल्यावर तो मेल करेल, फोन करेल याची तिला खात्री होती; पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. जायच्या आदल्या दिवसापर्यंत तळमळणारा समर तिकडे गेल्यावर जणू हवेत विरघळून गेला. त्यानं सगळ्यांना मेल केले फोन केले पण जानुला एकही फोन कधिही केला नाही. जसं काही डायरीतलं नकोसं पान फाडावं तसं जान्हवी हे पान त्यानं काढून टाकलं असावं. हळूहळू हे शल्य जानुला बोचायला लागलं. एक दिवस बोलता बोलता ती निमाला बोललीही की समरनं तिला किमान एखादी मेल करायला हरकत नव्हती. त्यावर निमा म्हणाली,"हा निर्णय तुझाच होता जानू. समरला तू हवी होतीस तुलाच तुझा कोष तोडायचा नव्हता. आता तक्रार का करतेस? त्यानं तुझ्याशी संपर्क नाही ठेवला तरी खरं तर आता तुझं काही बिघडायला नकोय नाही का?"..................
........दिवस भराभर उलटून गेले. धनूचं शिक्षण झालंे, त्याला दिल्लीत चांगली नोकरीही मिळाली. त्यानंतर सहा आठ महिन्यातच त्यानं छान स्थळं वगैरे बघून लग्न केलं. त्याच्या लग्नाच्यावेळेस जानू म्हणालिही की,"काय गडबड आहे धनू? अजून एखाद दोन वर्षांनी लग्न नाही केलं तरी चालेल" त्यावर धनूनं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की,"मला एकटं रहायचा कंटाळा आलाय. तिकडे दिल्लीत मी एकटा असतो, माझे जेवणा खाण्याचे हाल होतात शिवाय आज काय आणि आणखी दोन वर्षांनी काय लग्न करायचंच आहे. मला तुझ्यासारखं आझाद पंछी रहायचं नाही बाबा". यावर जास्त वाद न घालता जानुनं रात्री जेवताना ममालां सांगितलं यावर कधी काही न बोलणारी ममा तिला तटकन म्हणाली,"हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जान्हवी, त्यात एकमेकांनी तोंड खुपसू नये." हे वाक्य ममा ज्या पध्दतिनं बोलली त्याची धार जान्हविच्या मनाला झर्रकन कापत गेली. एक सेकंदभर तर ममा आपल्याला काही टोला हाणू पहातेय कां असंही वाटलं. एकंदर धनुचं लग्न तापदायक प्रकरणच झालं. धनू आठ दिवसांच्याच सुट्टीसाठी आला होता, तेव्हढ्यात ममानं चार चार मेरेजब्युरोत त्याचं नाव नोंदवलं. मैत्रिणिंना फोन करकरून सांगितलं. ममाची ही धांदल जानुला ठुसठुसत होती हे असं कां हे तिलाही उमगत नव्हतं आणि एक दिवस त्याचा उलगडा अगदी अचाकनपणानं तिला झाला. त्या दिवशी प्रभामावशिला मामा धनुला स्थळं बघण्याविषयी सांगत होती. प्रभामावशी ममाला म्हणाली एकदम धनुचं लग्न कसं काढलंस? जानुचं लग्न नको व्हायला? त्यावर ममा म्हणाली,"तिल नवरा बघणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. आम्ही काय बाई सामान्य माणसं." एकाएकी असा वर्मी घाव बसल्यानं जानू विचारात पडली, याचा अर्थ काय? ममाला तिनं प्रभामावशीसमोरच विचारलं तर ममा म्हण;ाली,"तुझ्या आयुष्यातले सगळेव निर्णय तुझे तू घेत आलीस जान्हवी. बाबा होते तोपर्यंत तुम्हा दोघांचं सगळं चालायचं. मला कधी विचारलंत? साधं शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाला तरी मला विचारायची तसदिही घेतली नाही, समरशी नातं मोडलंस त्यावेळेसही आधी एका शब्दानं सांगितलं नाहीस आणि नंतरही काही बोलली नाहीस. कदाचित तू माझ्याशी असलं काही बोलावं इतकी माझी लायकी तुला वाटली नसेल." संतापानं थरथरणारी ममा मोठा श्वास घेउन थांबली. तिचं हे रूप प्रभाला नवं होतं आणि जान्हविलाही. दोघी आवाक होउन पहातच राहिल्या. ममा पुढे म्हणाली,"मी तुझी आई होते जान्हवी. पहिल्या पहिल्यांदा मलाही तुझ्यापासून तुटलं जाण्याचा त्रास व्हायचा, तुझ्यात ना माझं रूप आलं ना गुण. तू तुझ्या बाबांची डुल्पिकेट म्हणून जन्माला आलीस आणि बाकिच्यांनीही याची जाणिव मला सतत करून दिली. मी अगदी सामान्य रूपाची आणि गुणाची होते पण मी तुझी आई होते याची जाण ना इतरांनी राखली ना तू. माझ्या आयुष्यातून तुला वजा करायला मला खुप कष्ट पडले जान्हवी पण तुला तर तो त्रासही झाला नाही कारण मी तुज्या आयुष्यात कधी नव्हतेच." इतकं बोलून ममा तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदाच जान्हविला आपल्या आयुष्यात काहीतरी विसंगती होती हे जाणवलं. विचार केला तर ही वस्तुस्थिती होती. तिनं ममाचा "आई" म्हणून विचार कमीच केला होता. ममाला "ममा" म्हणायचं हे देखिल बाबानंच ठरवलं होतं. बाबा दिसायला खुपच देखणा होता, हुशार होता आणि त्याच्या घरची परिस्थिती सधन होती याऊलट आई दिसायला अगदीच सामान्य म्हणावी अशी. शिक्षण म्हणायचं तर बीएची पदवी होती पण परिक्षा दिली आणि लग्न झाल्यानं तिनं बाहेरचं जगही पाहिलं नव्हतं. पहिल्याच वर्षात जान्हवी झाली. दिवस गेले तेंव्हा बाबानं खरं तर आईला खुपच झापलं होतं. इतकी कशी वेंधळी म्हणून हिणवलं होतं. इतकंच नाही तर हे मूल नको असंही सांगितलं होतं मात्र ममानं सगळा त्रास सहन करत जानुला जन्म दिला. बाळाला बघायला अनिच्छेनं आलेला बाबा बाळाचं गोंडस रूप पाहून हरवूनच गेला. बाळ बघायला येणारा प्रत्येकजण "बाबांसारखीच गोरीपान झालीय" म्हणून कौतुक करत होता. सुरवातिला ममलाही याचं काही वाटत नव्हतं पण जानू मोठी व्हायला लागली आणि तिच्या आयुष्यातलं बाबाचं स्थान पाहून मनात कुठेतरी झुरत राहिली. धनू झाल्यावर ती सावरली. धनू दिसायला ममासारखाच झाला होता. शिक्षणातही अगदी हुश्शार नाही पण ठीकच होता. नातेवाईक, सासूबाई सतत धनू आणि जानूची तुलना करत. जानू त्या स्तुतीनं सुखावत असे तर धनू आत येउन आईला बिलगत असे. धनू अगदी ममाज बॊय होता. सुरवातिला जानुचा तिरस्कार करणारा धनू वय वाढलं तसा जानुचा चांगला मित्र बनला. म्हणजे जनुला तसं वाटत राहिलं. बाबा असेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण अचानकच बाबा गेला आणि घडी विस्क्टली. ती सावरायची जबाबदारी कोणी न सांगता जानुनं स्वीकारली. त्यावेळेस तिनं असंच ग्रुहित धरलं होतं की बाबा गेल्यावर ममा एकटी सगळं सांभाळुच शकणार नाही. हे घर सांभाळणं आणि चालवणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यावेळेस आपण ममावर कुरघोडी करतोय असं तिला जाणवलंही नाही आणि आज ममानं इतक्या स्पष्टपणानं सगळं बोलल्यावर तिला आजवरचं तिचं जबाबदार असणं फुकाचं वाटायला लागलं. त्या दिवसांनंतर सगळं बिनसतच गेलं......
........दिवस भराभर उलटून गेले. धनूचं शिक्षण झालंे, त्याला दिल्लीत चांगली नोकरीही मिळाली. त्यानंतर सहा आठ महिन्यातच त्यानं छान स्थळं वगैरे बघून लग्न केलं. त्याच्या लग्नाच्यावेळेस जानू म्हणालिही की,"काय गडबड आहे धनू? अजून एखाद दोन वर्षांनी लग्न नाही केलं तरी चालेल" त्यावर धनूनं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की,"मला एकटं रहायचा कंटाळा आलाय. तिकडे दिल्लीत मी एकटा असतो, माझे जेवणा खाण्याचे हाल होतात शिवाय आज काय आणि आणखी दोन वर्षांनी काय लग्न करायचंच आहे. मला तुझ्यासारखं आझाद पंछी रहायचं नाही बाबा". यावर जास्त वाद न घालता जानुनं रात्री जेवताना ममालां सांगितलं यावर कधी काही न बोलणारी ममा तिला तटकन म्हणाली,"हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जान्हवी, त्यात एकमेकांनी तोंड खुपसू नये." हे वाक्य ममा ज्या पध्दतिनं बोलली त्याची धार जान्हविच्या मनाला झर्रकन कापत गेली. एक सेकंदभर तर ममा आपल्याला काही टोला हाणू पहातेय कां असंही वाटलं. एकंदर धनुचं लग्न तापदायक प्रकरणच झालं. धनू आठ दिवसांच्याच सुट्टीसाठी आला होता, तेव्हढ्यात ममानं चार चार मेरेजब्युरोत त्याचं नाव नोंदवलं. मैत्रिणिंना फोन करकरून सांगितलं. ममाची ही धांदल जानुला ठुसठुसत होती हे असं कां हे तिलाही उमगत नव्हतं आणि एक दिवस त्याचा उलगडा अगदी अचाकनपणानं तिला झाला. त्या दिवशी प्रभामावशिला मामा धनुला स्थळं बघण्याविषयी सांगत होती. प्रभामावशी ममाला म्हणाली एकदम धनुचं लग्न कसं काढलंस? जानुचं लग्न नको व्हायला? त्यावर ममा म्हणाली,"तिल नवरा बघणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. आम्ही काय बाई सामान्य माणसं." एकाएकी असा वर्मी घाव बसल्यानं जानू विचारात पडली, याचा अर्थ काय? ममाला तिनं प्रभामावशीसमोरच विचारलं तर ममा म्हण;ाली,"तुझ्या आयुष्यातले सगळेव निर्णय तुझे तू घेत आलीस जान्हवी. बाबा होते तोपर्यंत तुम्हा दोघांचं सगळं चालायचं. मला कधी विचारलंत? साधं शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाला तरी मला विचारायची तसदिही घेतली नाही, समरशी नातं मोडलंस त्यावेळेसही आधी एका शब्दानं सांगितलं नाहीस आणि नंतरही काही बोलली नाहीस. कदाचित तू माझ्याशी असलं काही बोलावं इतकी माझी लायकी तुला वाटली नसेल." संतापानं थरथरणारी ममा मोठा श्वास घेउन थांबली. तिचं हे रूप प्रभाला नवं होतं आणि जान्हविलाही. दोघी आवाक होउन पहातच राहिल्या. ममा पुढे म्हणाली,"मी तुझी आई होते जान्हवी. पहिल्या पहिल्यांदा मलाही तुझ्यापासून तुटलं जाण्याचा त्रास व्हायचा, तुझ्यात ना माझं रूप आलं ना गुण. तू तुझ्या बाबांची डुल्पिकेट म्हणून जन्माला आलीस आणि बाकिच्यांनीही याची जाणिव मला सतत करून दिली. मी अगदी सामान्य रूपाची आणि गुणाची होते पण मी तुझी आई होते याची जाण ना इतरांनी राखली ना तू. माझ्या आयुष्यातून तुला वजा करायला मला खुप कष्ट पडले जान्हवी पण तुला तर तो त्रासही झाला नाही कारण मी तुज्या आयुष्यात कधी नव्हतेच." इतकं बोलून ममा तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदाच जान्हविला आपल्या आयुष्यात काहीतरी विसंगती होती हे जाणवलं. विचार केला तर ही वस्तुस्थिती होती. तिनं ममाचा "आई" म्हणून विचार कमीच केला होता. ममाला "ममा" म्हणायचं हे देखिल बाबानंच ठरवलं होतं. बाबा दिसायला खुपच देखणा होता, हुशार होता आणि त्याच्या घरची परिस्थिती सधन होती याऊलट आई दिसायला अगदीच सामान्य म्हणावी अशी. शिक्षण म्हणायचं तर बीएची पदवी होती पण परिक्षा दिली आणि लग्न झाल्यानं तिनं बाहेरचं जगही पाहिलं नव्हतं. पहिल्याच वर्षात जान्हवी झाली. दिवस गेले तेंव्हा बाबानं खरं तर आईला खुपच झापलं होतं. इतकी कशी वेंधळी म्हणून हिणवलं होतं. इतकंच नाही तर हे मूल नको असंही सांगितलं होतं मात्र ममानं सगळा त्रास सहन करत जानुला जन्म दिला. बाळाला बघायला अनिच्छेनं आलेला बाबा बाळाचं गोंडस रूप पाहून हरवूनच गेला. बाळ बघायला येणारा प्रत्येकजण "बाबांसारखीच गोरीपान झालीय" म्हणून कौतुक करत होता. सुरवातिला ममलाही याचं काही वाटत नव्हतं पण जानू मोठी व्हायला लागली आणि तिच्या आयुष्यातलं बाबाचं स्थान पाहून मनात कुठेतरी झुरत राहिली. धनू झाल्यावर ती सावरली. धनू दिसायला ममासारखाच झाला होता. शिक्षणातही अगदी हुश्शार नाही पण ठीकच होता. नातेवाईक, सासूबाई सतत धनू आणि जानूची तुलना करत. जानू त्या स्तुतीनं सुखावत असे तर धनू आत येउन आईला बिलगत असे. धनू अगदी ममाज बॊय होता. सुरवातिला जानुचा तिरस्कार करणारा धनू वय वाढलं तसा जानुचा चांगला मित्र बनला. म्हणजे जनुला तसं वाटत राहिलं. बाबा असेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण अचानकच बाबा गेला आणि घडी विस्क्टली. ती सावरायची जबाबदारी कोणी न सांगता जानुनं स्वीकारली. त्यावेळेस तिनं असंच ग्रुहित धरलं होतं की बाबा गेल्यावर ममा एकटी सगळं सांभाळुच शकणार नाही. हे घर सांभाळणं आणि चालवणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यावेळेस आपण ममावर कुरघोडी करतोय असं तिला जाणवलंही नाही आणि आज ममानं इतक्या स्पष्टपणानं सगळं बोलल्यावर तिला आजवरचं तिचं जबाबदार असणं फुकाचं वाटायला लागलं. त्या दिवसांनंतर सगळं बिनसतच गेलं......
आमचा पहिला वहिला युथ फेस्टिव्हल
आमच्या डिपार्टमेंटनं आजवर कधिही युथफेस्टिव्हलमध्ये भाग घेतला नव्हता. त्यावर्षी आमच्यातलं "टॆलेण्ट" विभागातल्या एका उत्साही सरांच्या लक्षात आलं आणि ठरलं की युथ फेस्टिव्हल मध्ये यंदा आमच्या विभागाची टिम पाठवायचीच. दुसर्या एकाउत्साही सरांनी एकांकिका लिहायचं शिवधनुष्य उचललं. कलाकारांची निवड झाली. अर्थात अस्मादिक त्यात होतेच. ऐनवेळेस सगळं ठरल्यानं खुपच घाई झाली पण आम्ही माघार घ्यायला तयार नव्हतो. होस्टेलमधून खास परवानगी मिळवून तालिमीसाठी सगळ्याचजणी जायला लागलो. रात्री दहा साडेदहा पर्यंत तालमी चालू झाल्या. इथे भ्रष्टाचार करून मेलेले आणि नंतर स्वर्गात जाऊन तिथेही हा रोग पसरवणारे राजकिय नेते आणि त्यांच्या मागोमाग स्वर्गात गेलेल्या त्यांच्या बायका असा सगळा सावळा गोंधळ कथेत होता. सगळं धमाल जमलं होतं. त्यात सगळे हौशी कलाकार असल्यानं तालमिंच्यावेळेस धमाल यायची. इतकं सगळं करून, रात्री जागल्यानं पित्त वाढवून घेउनही काही फायदा झाला नाहीच. निवडचाचणित आम्ही बाहेर फेकलो गेलो.तरीही आम्ही शस्त्रं टाकली नाहीत. त्याच कथेत फेरफार करून दुसर्या एका स्पर्धेसाठी नाव दिलं. तिथेही आम्हाला फुटाची गोळी दिली. आता तर आमच्यावरचा अन्याय दूर करण्याचा किडा जोरात चावला. त्याच कथेत फेरफार करून तिथल्यातिथे तासाभरात आम्ही पथनाट्य बसवलं आणि चाचणीसाठी उभे राहिलो. इथे चक्क आमची निवड झाली कारण दुसरं कोणी आलेलंच नव्हतं. काही का असेना, आम्ही "आत" होतो हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं. आता तालमी चालू झाल्या. पूर्वीचा बाज बदलून थोडं लाऊड करताना खुपच गंमती जमती व्हायला लागल्या. संवाद बोलताना मध्येच पुर्वीचा सूर धरला जाऊ लागला. हे सगळं घोटवत बसायला वेळही नव्हता कार अवघ्या काही दिवसांवर युथफेस्टिव्हल येउन ठेपला होता. अखेरच्या दिवशी आम्हाला एक चांगली बातमी समजली की आमची एकांकिकेसाठीही निवड झालेली आहे. एकच स्क्रिप्ट आम्ही दोन ठिकाणी दोन पध्दतिंनी सादर करणार होतो. आम्ही सगळे स्मिता पाटील, नासिरूद्दीन शहा यांचे बाप असल्यानं अभिनय करायला डगमगत नव्हतो. सांगा फक्त काय करायचंय? या आवेशात होतो. कळस म्हणजे युथफेस्टिव्हलच्या दिवशीही सकाळी एका मैत्रीणीच्य घराच्य गच्चीवर आमची तालिम रंगली होती. तिच्याच घरातलं कपाट उघडून ऐनवेळेस आम्ही कपडेपट बनवत होतो. कारण आमच्याकडे साड्या वगैरे आणि मुलांकडे झब्बे असायचं काही कारणच नव्हतं. त्यातून सगळेच होस्टेलवर रहाणारे त्यामुळे उत्साहाच्याभरात कपड्यांचं काय करायचं या मुख्य मुद्द्याकडे दूर्लक्ष झालेलं होतं. मैत्रीणिच्या आई, भाऊ आणि वडिलंनी उदार मनानं त्यांची कपाटं आम्हाला उघडून दिली म्हणून बरंय नाही तर पुढार्यांच्या बायका थेट जिन्समध्ये स्वर्गात गेल्या असत्या. एकिकडे संवादांची तालिम चालली होती तर दुसरीकडे ब्लाऊज दोन इंच धरावं की तीन याचा खल चाललेला होता. ते सगळं ऐकणं खुपच मौजेचं होतं. एकिकडे भारतातल्या भ्रष्टचारावर आसूड ओढले जत होते आणि त्याचवेळेस पलिकडे लांब पायजमा जरा आखुड कसा करता येईल याबाबत चर्चा चालू होती. आमच्यामते आमची तयारी झकास झालेली होती. सगळं सामानसुमान घेउन आम्ही नाट्यगरुहात पोहोचलो. तिथे आमच्यासाठी टाळ्या वाजवायला आलेली आमची दोस्त मंडळी हजर होती ती आम्हाला पाहून युरेका युरेका करत धावत आली आणि म्हणाली होत कुठे तुम्ही? म्हटलं कां? तर त्यांनी सांगितलं की ऐनवेळेस वेळापत्रकात बदल करून एकांकिका सकाळी घेतल्या आणि संध्याकाळी पथनाट्य आहे. त्यातून आमच्या गटाची एकांकिका पहिलीच होती आणि चार पाच वेळा आमचं नाव पुकारून अखेर पुढच्या गटाला बोलविण्यात आलं होतं. आता आत शेवटची एकांकिका चालू होती. पाय गळले काय करावं सुचेना. आमच्या मित्रमंडळानं आम्हाला सगळीकडे शोधलं होतं. आम्ही मात्र रंगीत तालिम करत होतो. ते तर झालंच आणि मग लक्षात आलं की, अरे देवा! कपड्यांची तासभर केलेली टाचाटाची फुकटच गेली म्हणायची. आम्ही संयोजकांना विनंती करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अखेर संध्याकाळच्या पथनाट्यावर लक्ष केंद्रीत केलं. एव्हाना डोक्याचा भुगा झालेला होता. काही सुधरत नव्हतं. नक्की काय करायचं हा गोंधळ झाला होता तो वेगळाच. दोन दोन गोष्टी एकाचवेळेस करायला गेल्यानं संवादांची सरमिसळ झालेली होती. आम्ही अखेर रंगमंचावर गेलोच आणि पथनाट्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते सादर करून परतलो. निकाल बिकाल ऐकायचं धाडसही केलं नाही. हे सगळं झालं तरी एक गोष्ट मात्र नक्की झाली की विभागात आम्ही एक इतिहास बनविला.आमची पहिलीच बॆच होती जी युथफेस्टिव्हलमध्ये गेली. तिकडे काय झालं याला इतरांच्या लेखी फार महत्व नव्हतं. असतं तरी काय फरक पडला असता म्हणा.....:)
Subscribe to:
Posts (Atom)

